नवी दिल्ली: संसद घुसखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांना अटक केली होती. चारही आरोपींकडून दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे नवनवे खुलासे समोर येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली आहे की संसदेत घुसखोरी करण्याचा कट तब्बल दीड वर्षांपूर्वी रचण्यात आला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी सोशल मीडिया पेज भगत सिंह फॅन क्लबच्या माध्यमातून जोडले गेले होते. हे सर्वजण दीड वर्षांपूर्वी मैसूर येथे भेटले होते. तेव्हाच याचा कट रचण्यास सुरूवात झाली होती. चौकशीदरम्यान असेही समोर आले की १० डिसेंबरला सर्वजण एकएक करून दिल्लीला पोहोचतील आणि १० डिसेंबरच्या रात्रीच सर्व आरोपी गुरूग्राममध्ये विक्कीच्या घरी पोहोचले होते. रात्री उशिरा ललित झाही विक्कीच्या घरी पोहोचले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा कट सत्यात उतरवण्याआधी आरोपींनी संसदेची रेकीही केली होती. जुलैमध्ये सागरला संसद भवनाची रेकी करण्यासाठी लखनऊवरून दिल्लीला पाठवण्यात आले होते. जुलैमध्ये सागर संसद भवनाच्या आत जाण्यास यशस्वी ठरला नव्हता. यानंतर तो संसद भवनाच्या बाहेरून गेट आणि सुरक्षा विभागाची रेकी करून निघून गेला होता.
चौकशीदरम्यान असेही समोर आले आहे आरोपी अमोल महाराष्ट्रातून स्मोक क्रॅकर घेऊन आला होता. हे सर्व घडण्याआधी हे आरोपी इंडिया गेटवर भेटले होते. येथे सर्वांना स्मोक क्रॅकर वाटण्यात आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी संसदेत दाखल झाले होते. तर अमोल शिंदे आणि नीलम आझाद हे संसदेच्या बाहेर होते. ललित या सर्वांचे व्हिडिओ बनवत होता. गदारोळानंतर जसे पोलिसांनी अमोल आणि नीलमला ताब्यात घेतले ललित सर्वांचे फोन घेऊन त्या ठिकाणाहून फरार झाला.
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…
मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक…
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या…
मुंबई : मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा…
मुंबई : मुंबई आणि उपनगरांत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले…