Security breach in Loksabha : संसदेतल्या धूर प्रकरणात पाच जणांचा समावेश; एकजण निघाला लातूरचा

पाचही जण दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात


नवी दिल्ली : संसदेत (Parliament) आज लोकसभेचं (Loksabha) कामकाज सुरु असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारत स्मोक कँडल्स (Smoke candles) जाळून धूर केल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्याचवेळी संसदेच्या बाहेर तिघांनी कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या फोडून आंदोलन केले. यापैकी पाचही जणांना दिेल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक महिला आणि एका महाराष्ट्रातील तरुणाचाही समावेश आहे.


लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही ४२ वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर २५ वर्षीय अमोल शिंदे (Amol Shinde) हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे दोघंजण संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे कलर स्मोक घेऊन आंदोलन करत होते.


सभागृहात धूर करणार्‍यांपैकी एकाचे नाव सागर शर्मा असून त्याला खासदार कोटकांनी पकडलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.

Comments
Add Comment

एका सुवर्णपर्वाचा अस्त, शिल्पकलेचा आदर्श घालून देणारे पद्मश्री राम सुतार काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली: शेकडो शिल्पांना आकार देऊन जगासमोर शिल्पकलेचा आदर्श ठेवणारे जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी