Security breach in Loksabha : संसदेतल्या धूर प्रकरणात पाच जणांचा समावेश; एकजण निघाला लातूरचा

  96

पाचही जण दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात


नवी दिल्ली : संसदेत (Parliament) आज लोकसभेचं (Loksabha) कामकाज सुरु असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारत स्मोक कँडल्स (Smoke candles) जाळून धूर केल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्याचवेळी संसदेच्या बाहेर तिघांनी कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या फोडून आंदोलन केले. यापैकी पाचही जणांना दिेल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक महिला आणि एका महाराष्ट्रातील तरुणाचाही समावेश आहे.


लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही ४२ वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर २५ वर्षीय अमोल शिंदे (Amol Shinde) हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे दोघंजण संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे कलर स्मोक घेऊन आंदोलन करत होते.


सभागृहात धूर करणार्‍यांपैकी एकाचे नाव सागर शर्मा असून त्याला खासदार कोटकांनी पकडलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.

Comments
Add Comment

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी

भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी