parliment security: ६ लोकांनी मिळून संसदेत केली होती घुसखोरी, ४ जण ताब्यात

नवी दिल्ली: हाय सिक्युरिटी असलेल्या संसदेच्या सुरक्षेबाबत झालेल्या चुकीवरून अनेक सवाल केले जात आहेत. यातच न्यूज एजन्सी पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की या संपूर्ण घटनेत सहा जण सामील होते. यातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर दोघांचा तपास सुरू आहे.


यांची नावे सागर, विक्रम, नीलम, अमोल आणि मनोरंजन आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी एकमेकांना ओळखत होते आणि गुरूग्रामच्या सेक्टर ७च्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये एकत्र थांबले होते.हे घर विक्रमचे होते. येथे संसदेच्या आत घुसण्याबाबतचा कट रचण्यात आला होता.



पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या लोकांकडून कोणताही मोबाईल फोन मिळालेला नाही. चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलीस पकडलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनचा शोध घेत आहे.



चारजण ताब्यात


ज्या पाच जणांना पोलिसांनी पकडले आहे त्यातील दोघांनी लोकसभेच्या दर्शक दीर्घा येथून उडी घेतली आणि जमिनीवर उडी मारली.या दोघांची ओळख मनोरंजन आणि सागर शर्मा अशी आहे. तर संसद परिसरात आंदोलनादरम्यान कॅन घेऊन धूर सोडणाऱ्यांची ओळख हरयाणातील जिंद जिल्ह्यातील खुर्द गावातील निवासी निलम आणि महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे अशी आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले हे चारही जण विविध शहरातील आहेत. असे असतानाही ते सगळे एकमेकांना कसे ओळखत होते असा सवाल आहे. जर चारही जण एकमेकांना ओळखत होते तर यांचा हेतू काय होता? किती वेळात त्यांनी संसदेत घुसखोरी करण्याची प्लानिंग केली. हे सगळे सवाल उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी