INDW vs ENGW: तिसऱ्या टी-२०मध्ये भारताने इंग्लंडला दिली मात

  63

नवी दिल्ली: भारत दौऱ्यावरील इंग्लंडच्या महिला संघाला तिसरा टी-२० सामना गमवावा लागला. हा सामना भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला भारताच्या महिला संघाने २० षटकांत १२६ धावांवर बाद केले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना १९ षटकांत ५ विकेट गमावत लक्ष्य पूर्ण केले. भारतासाठी सायका इशाक आणि श्रेयांका पाटील यांनी ३-३ विकेट मिळवल्या.


मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगले्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. इंग्लंडसाठी कर्णधार हीथर नाईटने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. यात ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. याशिवाय एमी जोन्सने २१ बॉलमध्ये ३ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या.



एक षटक राखत मिळवला विजय


इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने १ षटक राखत विजय मिळवला. दरम्यान, संघाची पहिली विकेट शेफाली वर्माच्या रूपात तिसऱ्या ओव्हरमध्येच पडली होती. ती ६ धावा करून परतली. दुसऱ्या विकेटसाठी स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी ५७ धावांची भागीदारी रचली. जेमिमा ३३ चेंडूत २९ धावा करून परतली.


त्यानंतर १६व्या षटकांत दीप्ती शर्मा १२ धावांवर, स्मृती मंधाना १७व्या षटकात ४८ धावा करून तर १९व्या षटकांत ऋचा घो, २ धावा करून परतली. मंधानाने संघाकडून सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमनजोत कौर संघाला विजय मिळवून देताना नाबाद राहिल्या. कर्णधार ६ धावांवर तर अमनजोत १० धावांवर नाबाद राहिल्या.


Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे