IND vs SA: टीम इंडियासाठी झटका! टी-२० नंतर आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका मिस करू शकतो हा स्टार क्रिकेटर

मुंबई: भारत(india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यातील डर्बनमध्ये होणारा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे टॉस न होताच रद्द करण्यात आला. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहर पहिल्या टी-२०मध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. आता अशी माहिती समोर आली आहे की दीपक पूर्ण टी-२० शिवाय वनडे मालिकाही मिस करू शकतो. दीपकला टी-२० आणि वनडे मालिकेत भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले होते.


वडिलांच्या अचानक आजारपणामुेळे त्याने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याला न खेळण्याचे ठरवले होते. मात्र आता टेलिग्राफ इंडियाच्या माहितीनुसार दीपक वनडे मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपकने आतापर्यंत डर्बनमध्ये टीम इंडियाला जॉईन केलेले नाही. कारण त्याच्या कुटुंबियांसाठी ब्रेक घेतला होतो. वडिलांची स्थिती कशी यावर तो संघात जॉईन होणार की नाही हे ठरवणार आहे.


दीपकने ५ डिसेंबरला स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले होते की त्याचे वडील त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण तो आज जोपण आहे ते त्याच्या वडिलांमुळेच. त्यांना अशा स्थितीत सोडून जाणे शक्य नाही. आपल्या वडिलांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले नाहीतर काहीही घडू शकले असते. दरम्यान, चहरच्या वडिलांच्या तब्येतीवर त्याचे संघात खेळणे अवलंबून आहे.



आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय करिअर


दीपकने आतापर्यंत टीम इंडियासाठी १३ वनडे आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आतापर्यंतच्या करिअरमध्ये दीपकने अनेक दुखापतींचा सामना केला. यामुळे अनेकदा त्याला संघाबाहेर राहावे लागले. त्याने १३ वनडे सामन्यात ३०.५६चया सरासरीने १६ विकेट आणि २५ टी-२० सामन्यात २४.०९च्या सरासरीने ३१ विकेट आपल्या नावे केले आहेत.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य