IND vs SA: टीम इंडियासाठी झटका! टी-२० नंतर आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका मिस करू शकतो हा स्टार क्रिकेटर

मुंबई: भारत(india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यातील डर्बनमध्ये होणारा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे टॉस न होताच रद्द करण्यात आला. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहर पहिल्या टी-२०मध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. आता अशी माहिती समोर आली आहे की दीपक पूर्ण टी-२० शिवाय वनडे मालिकाही मिस करू शकतो. दीपकला टी-२० आणि वनडे मालिकेत भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले होते.


वडिलांच्या अचानक आजारपणामुेळे त्याने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याला न खेळण्याचे ठरवले होते. मात्र आता टेलिग्राफ इंडियाच्या माहितीनुसार दीपक वनडे मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपकने आतापर्यंत डर्बनमध्ये टीम इंडियाला जॉईन केलेले नाही. कारण त्याच्या कुटुंबियांसाठी ब्रेक घेतला होतो. वडिलांची स्थिती कशी यावर तो संघात जॉईन होणार की नाही हे ठरवणार आहे.


दीपकने ५ डिसेंबरला स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले होते की त्याचे वडील त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण तो आज जोपण आहे ते त्याच्या वडिलांमुळेच. त्यांना अशा स्थितीत सोडून जाणे शक्य नाही. आपल्या वडिलांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले नाहीतर काहीही घडू शकले असते. दरम्यान, चहरच्या वडिलांच्या तब्येतीवर त्याचे संघात खेळणे अवलंबून आहे.



आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय करिअर


दीपकने आतापर्यंत टीम इंडियासाठी १३ वनडे आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आतापर्यंतच्या करिअरमध्ये दीपकने अनेक दुखापतींचा सामना केला. यामुळे अनेकदा त्याला संघाबाहेर राहावे लागले. त्याने १३ वनडे सामन्यात ३०.५६चया सरासरीने १६ विकेट आणि २५ टी-२० सामन्यात २४.०९च्या सरासरीने ३१ विकेट आपल्या नावे केले आहेत.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड