Nitesh Rane : ...तर गाठ या मराठ्यांशी आहे!

फडणवीसांविरोधात बोलणार्‍या जरांगे पाटलांना आमदार नितेश राणे यांनी सुनावले खडेबोल


मुंबई : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj Reservation) देण्याची प्रक्रिया करत आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) दौरे करत राज्यभरातील मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. पण हे करत असताना मराठा बांधवांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम ते करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर वाटेल तसे आरोप ते करत आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे मैदानात उतरले आहेत. फडणवीसांविरोधात बोलणार्‍या जरांगे पाटलांना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.


नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशीच स्पष्ट केलं होतं की, देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही ती कधीही सहन करणार नाही. मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय? तुमची भाषणं कोण लिहून देतंय? तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय? याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढावी लागेल.


मराठा आरक्षणाबद्दल बोलत असाल तर आम्ही तुमचं स्वागतच करु पण ज्या देवेंद्र फडणवीसजींनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य योजना मराठा समाजासाठी जाहीर केल्या, त्यांच्याविरोधात जर तुम्ही भूमिका घ्यायला सुरुवात कराल, तर गाठ या मराठ्यांशी आहे, हे लक्षात राहू द्या, असं आव्हान नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिलं आहे.


Comments
Add Comment

Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ.

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.