मुंबई : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj Reservation) देण्याची प्रक्रिया करत आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) दौरे करत राज्यभरातील मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. पण हे करत असताना मराठा बांधवांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम ते करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर वाटेल तसे आरोप ते करत आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे मैदानात उतरले आहेत. फडणवीसांविरोधात बोलणार्या जरांगे पाटलांना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशीच स्पष्ट केलं होतं की, देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही ती कधीही सहन करणार नाही. मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय? तुमची भाषणं कोण लिहून देतंय? तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय? याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढावी लागेल.
मराठा आरक्षणाबद्दल बोलत असाल तर आम्ही तुमचं स्वागतच करु पण ज्या देवेंद्र फडणवीसजींनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य योजना मराठा समाजासाठी जाहीर केल्या, त्यांच्याविरोधात जर तुम्ही भूमिका घ्यायला सुरुवात कराल, तर गाठ या मराठ्यांशी आहे, हे लक्षात राहू द्या, असं आव्हान नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिलं आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…