Nitesh Rane : ...तर गाठ या मराठ्यांशी आहे!

फडणवीसांविरोधात बोलणार्‍या जरांगे पाटलांना आमदार नितेश राणे यांनी सुनावले खडेबोल


मुंबई : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj Reservation) देण्याची प्रक्रिया करत आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) दौरे करत राज्यभरातील मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. पण हे करत असताना मराठा बांधवांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम ते करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर वाटेल तसे आरोप ते करत आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे मैदानात उतरले आहेत. फडणवीसांविरोधात बोलणार्‍या जरांगे पाटलांना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.


नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशीच स्पष्ट केलं होतं की, देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही ती कधीही सहन करणार नाही. मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय? तुमची भाषणं कोण लिहून देतंय? तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय? याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढावी लागेल.


मराठा आरक्षणाबद्दल बोलत असाल तर आम्ही तुमचं स्वागतच करु पण ज्या देवेंद्र फडणवीसजींनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य योजना मराठा समाजासाठी जाहीर केल्या, त्यांच्याविरोधात जर तुम्ही भूमिका घ्यायला सुरुवात कराल, तर गाठ या मराठ्यांशी आहे, हे लक्षात राहू द्या, असं आव्हान नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिलं आहे.


Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस