IND vs SA: पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ, भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टी-२० रद्द

डर्बन: भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील किंग्समीडमध्ये खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळेच सुरूच होऊ शकला नाही. सतत पावसाचा व्यत्यय राहिल्याने सामन्यात टॉसही होऊ शकला नाही. अखेर वातावरण आणि मैदानाची स्थिती पाहता अंपायर्सनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार होता. तर सामना साडेसात वाजता सुरू होणार होता. मात्र आधीपासूनच पाऊस सुरू होता. यामुळे टॉसही होऊ सकला नाही. बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहण्यात आली. मात्र पाऊस थांबण्याचे नावच घेईना यामुळे सामना अखेर रद्द करावा लागला.



निराश होऊन परतले प्रेक्षक


भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना टॉस न होताच रद्द झाला. हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सर्व तिकीटे बुक झाली होती. मात्र पावसामुळे चाहत्यांना निराश होत घरी परतावे लागले.



सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडिया


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया तीन सामन्यांची टी-२० मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२०मध्ये सूर्यकुमार यादव नेतृत्व कऱणार आहे. तर वनडे मालिकेत केएल राहु आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व कऱणार आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य