IND vs SA: पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ, भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टी-२० रद्द

डर्बन: भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील किंग्समीडमध्ये खेळवला जाणार होता. मात्र हा सामना पावसामुळेच सुरूच होऊ शकला नाही. सतत पावसाचा व्यत्यय राहिल्याने सामन्यात टॉसही होऊ शकला नाही. अखेर वातावरण आणि मैदानाची स्थिती पाहता अंपायर्सनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार होता. तर सामना साडेसात वाजता सुरू होणार होता. मात्र आधीपासूनच पाऊस सुरू होता. यामुळे टॉसही होऊ सकला नाही. बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहण्यात आली. मात्र पाऊस थांबण्याचे नावच घेईना यामुळे सामना अखेर रद्द करावा लागला.



निराश होऊन परतले प्रेक्षक


भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना टॉस न होताच रद्द झाला. हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सर्व तिकीटे बुक झाली होती. मात्र पावसामुळे चाहत्यांना निराश होत घरी परतावे लागले.



सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडिया


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया तीन सामन्यांची टी-२० मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२०मध्ये सूर्यकुमार यादव नेतृत्व कऱणार आहे. तर वनडे मालिकेत केएल राहु आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व कऱणार आहे.

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट