Bollywood actors : बॉलिवूडचा किंग खान, खिलाडी आणि सिंघमला मिळाली केंद्र सरकारची नोटीस...

काय आहे प्रकरण?


मुंबई : शाहरुख खान (Shahrukh Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgan) ही १९९० च्या दशकापासून आतापर्यंत सर्वाधिक चाहतेवर्ग असणारी बॉलिवूडची कलाकार मंडळी (Bollywood actors) आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करत असतात. त्यांचा कोणताही नवा चित्रपट आला की चित्रपटगृहात चाहत्यांची झुंबड उडते. पण या तीन कलाकारांना केंद्र सरकारकडून (Central Government) एक नोटीस मिळाली आहे, ही नोटीस नेमकी कशाबद्दल हे जाणून घेऊयात.


तिघेही कलाकार अनेक जाहिरातींमधून आपल्याला दिसत असतात. पण त्यांची नेहमीच चर्चेत राहणारी जाहिरात म्हणजे पान मसाल्याची जाहिरात (Pan Masala Ad). ही जाहिरात अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरली आहे. मोतीलाल यादव यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका सादर केली होती. शाहरुख, अजय आणि अक्षय तिघांचं बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. तिघेही पद्म पुरस्काराने सम्मानित आहेत. या सम्मानित लोकांनी केलेल्या अशा जाहिरातींमुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे असं याचिकाकर्ते मोतीलाल यादव यांचं म्हणणं आहे. कलाकारांच्या या वागण्यामुळे लोक चुकीच्या मार्गाला जातात असंही ते म्हणाले.


या प्रकरणात केंद्र सरकारच्या सुचनेनुसार अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ९ मे २०२४ पुढील सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान खंडपीठाने याप्रकरणी आदेश दिले आहेत. लखनऊ खंडपीठाने केलेल्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार, पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय आणि अक्षय कुमारला नोटीस मिळाली आहे. मध्यंतरी अक्षय कुमार दोन जाहिरातींमध्ये दिसला होता. मात्र नंतर त्याने करार रद्द केला. तरी त्यालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी