Bollywood actors : बॉलिवूडचा किंग खान, खिलाडी आणि सिंघमला मिळाली केंद्र सरकारची नोटीस...

काय आहे प्रकरण?


मुंबई : शाहरुख खान (Shahrukh Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgan) ही १९९० च्या दशकापासून आतापर्यंत सर्वाधिक चाहतेवर्ग असणारी बॉलिवूडची कलाकार मंडळी (Bollywood actors) आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करत असतात. त्यांचा कोणताही नवा चित्रपट आला की चित्रपटगृहात चाहत्यांची झुंबड उडते. पण या तीन कलाकारांना केंद्र सरकारकडून (Central Government) एक नोटीस मिळाली आहे, ही नोटीस नेमकी कशाबद्दल हे जाणून घेऊयात.


तिघेही कलाकार अनेक जाहिरातींमधून आपल्याला दिसत असतात. पण त्यांची नेहमीच चर्चेत राहणारी जाहिरात म्हणजे पान मसाल्याची जाहिरात (Pan Masala Ad). ही जाहिरात अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरली आहे. मोतीलाल यादव यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका सादर केली होती. शाहरुख, अजय आणि अक्षय तिघांचं बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. तिघेही पद्म पुरस्काराने सम्मानित आहेत. या सम्मानित लोकांनी केलेल्या अशा जाहिरातींमुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे असं याचिकाकर्ते मोतीलाल यादव यांचं म्हणणं आहे. कलाकारांच्या या वागण्यामुळे लोक चुकीच्या मार्गाला जातात असंही ते म्हणाले.


या प्रकरणात केंद्र सरकारच्या सुचनेनुसार अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ९ मे २०२४ पुढील सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान खंडपीठाने याप्रकरणी आदेश दिले आहेत. लखनऊ खंडपीठाने केलेल्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार, पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय आणि अक्षय कुमारला नोटीस मिळाली आहे. मध्यंतरी अक्षय कुमार दोन जाहिरातींमध्ये दिसला होता. मात्र नंतर त्याने करार रद्द केला. तरी त्यालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा

West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर

भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस

Chhattisgarh Accident : छत्तीसगड हादरलं! लग्नावरून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ३ गंभीर जखमी

छत्तीसगडमधील कांकेर (Chhattisgarh Accident) जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारही तेजीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांतता चर्चा पुन्हा मार्गी लागल्याच्या बातमीने बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे