Chhattisgarh CM : भाजपने छत्तीसगडमध्ये आदिवासी नेत्याला दिले मुख्यमंत्रीपद

  140

अनेक दिवसांपासून होता सस्पेन्स; कोणाची नावे होती चर्चेत?


रायपूर : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकींमध्ये (Assembly Elections) छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत भाजपाचा (BJP) दणदणीत विजय झाला. तर तेलंगणामध्ये काँग्रेसचा (Congress) विजय झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली. मात्र, भाजपकडून मुख्यमंत्र्यांचा सस्पेन्स कायम होता. नुकताच छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला आहे. भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आज छत्तीसगडची कमान विष्णू देव साय (Vishnu Deo Sai) यांच्याकडे सोपवण्यात आली.


विष्णू देव साय हे आदिवासी नेते आणि राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नाव आहे. छत्तीसगड राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आणि भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव करून राज्य परत घेतले. २०१८ मध्ये काँग्रेसने विजय मिळवण्यापूर्वी राज्यात भाजपची १५ वर्षांची सत्ता होती. छत्तीसगडमध्ये भाजप विजयी झाल्यामुळे काँग्रेसला राज्य राखता आले नाही. ९० सदस्यीय विधानसभेच्या सभागृहात, काँग्रेसने जिंकलेल्या ३५ जागांच्या तुलनेत भाजपने ५४ जागा जिंकून आरामात विजय मिळवला.



कोण आहेत विष्णू देव साय?


आदिवासी समाजातील विष्णू देव साय यांनी १९८० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. विष्णू देव हे छत्तीसगडच्या कुंकुरी विधानसभेतील आहेत. राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आदिवासी चेहऱ्यावर भाजप बाजी मारेल अशी अटकळ होती, ती खरी ठरली. विष्णू देव साई २०२० मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. ते खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत. याशिवाय ते आरएसएस आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही जवळचे आहेत.


विष्णू देव साय यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९६४ रोजी जशपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रीय पोलाद राज्यमंत्री होते. १६व्या लोकसभेत छत्तीसगडमधील रायगडमधून विजयी होऊन ते खासदार झाले. १९९०-९८ मध्ये ते दोनदा आमदार होते. यानंतर ते १९९९ ते २०१४ पर्यंत खासदार झाले. खासदार असताना त्यांनी अनेक समित्या आणि पदे भूषवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १९८० मध्ये बगिया येथून सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध जिंकली होती. यानंतर १९९० मध्ये पहिल्यांदा त्यांनी आपल्या मालमत्तेचा काही भाग विकून आमदारकीची निवडणूक लढवली आणि विजयी झाले.




मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण होते आघाडीवर?


भाजपाने छत्तीसगड राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराशिवाय निवडणूक लढवली, त्यामुळे पक्ष नवीन चेहऱ्यांसोबत जाणार असल्याच्या कयासांना बळ मिळाले. मात्र, रमण सिंग, रामविचार नेताम, अरुण साओ, ओपी चौधरी, सरोज पांडे आणि विष्णू देव साई हे रिंगणात आघाडीवर होते. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे दिग्गज नेते रमणसिंग यांची या पदासाठी निवड न केल्यास भाजप ओबीसी किंवा आदिवासी उमेदवारासोबत जाईल, असा अंदाजही वर्तवला जात होता. हा अंदाज खरा ठरला असून विष्णू देव साई यांची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके