Nawab Malik : नवाब मलिकांना महायुतीत घेणार की नाही? अजितदादांनी दिलं उत्तर...

  97

मलिकांना देवेंद्र फडणवीसांचा विरोध


नागपूर : नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter Session) पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधाऱ्यांच्या शेवटच्या बाकावर बसलेले दिसून आले. म्हणजेच त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला साथ देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मलिकांना सरकारमध्ये सामील करुन घेण्यास विरोध दर्शवला. याबाबत त्यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. 'सत्ता येते जाते, पण देश महत्त्वाचा. मलिकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये', असं फडणवीस म्हणाले. शिवाय हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संमतीने लिहिले असल्याचे सांगितले.


अजित पवार यांना हे पत्र मिळाले असून आता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आले आहेत. अद्याप त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं नाही. त्यांची भूमिका काय आहे, ते ऐकल्यानंतरच मी माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करेन. कोणी कुठे बसायचं हे सांगणं माझा अधिकार नाही, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.


त्यामुळे नवाब मलिकांना आता सत्तेत सामील करुन घेतले जाणार का, शिवाय नाही घेतलं तर शरद पवार गट त्यांना पुन्हा सामील करुन घेण्यास संमती दर्शवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल