Nawab Malik : नवाब मलिकांना महायुतीत घेणार की नाही? अजितदादांनी दिलं उत्तर...

मलिकांना देवेंद्र फडणवीसांचा विरोध


नागपूर : नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter Session) पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधाऱ्यांच्या शेवटच्या बाकावर बसलेले दिसून आले. म्हणजेच त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला साथ देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मलिकांना सरकारमध्ये सामील करुन घेण्यास विरोध दर्शवला. याबाबत त्यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. 'सत्ता येते जाते, पण देश महत्त्वाचा. मलिकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये', असं फडणवीस म्हणाले. शिवाय हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संमतीने लिहिले असल्याचे सांगितले.


अजित पवार यांना हे पत्र मिळाले असून आता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मी वाचलं. नवाब मलिक हे काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आले आहेत. अद्याप त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं नाही. त्यांची भूमिका काय आहे, ते ऐकल्यानंतरच मी माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करेन. कोणी कुठे बसायचं हे सांगणं माझा अधिकार नाही, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.


त्यामुळे नवाब मलिकांना आता सत्तेत सामील करुन घेतले जाणार का, शिवाय नाही घेतलं तर शरद पवार गट त्यांना पुन्हा सामील करुन घेण्यास संमती दर्शवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना