K Chandrashekar Rao : केसीआर बाथरुममध्ये पडले! निकालाचा घेतला धसका?

हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरु


हैदराबाद : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Former Telangana Chief Minister K Chandrashekar Rao) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रात्रीच्या सुमारास केसीआर (KCR) एररावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसवर बाथरुममध्ये पाय घसरुन पडले. यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पार पडणार आहे. सध्या त्यांच्यावर हैदराबादच्या (Hyderabad) यशोदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


केसीआर यांच्या मुलीने ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या रुग्णालयात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे वडील लवकरच बरे होतील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.





नुकतेच विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले, ज्यात तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून मुख्यमंत्री असणारे केसीआर यांचा पराभव झाला. काँग्रेसचा तेलंगणामध्ये विजय झाला असून रेवंथ रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे २०१३ पासून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांची मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक हुकली.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान