K Chandrashekar Rao : केसीआर बाथरुममध्ये पडले! निकालाचा घेतला धसका?

हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरु


हैदराबाद : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Former Telangana Chief Minister K Chandrashekar Rao) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रात्रीच्या सुमारास केसीआर (KCR) एररावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसवर बाथरुममध्ये पाय घसरुन पडले. यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पार पडणार आहे. सध्या त्यांच्यावर हैदराबादच्या (Hyderabad) यशोदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


केसीआर यांच्या मुलीने ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या रुग्णालयात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे वडील लवकरच बरे होतील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.





नुकतेच विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले, ज्यात तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून मुख्यमंत्री असणारे केसीआर यांचा पराभव झाला. काँग्रेसचा तेलंगणामध्ये विजय झाला असून रेवंथ रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे २०१३ पासून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांची मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक हुकली.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे