Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट नव्हे तर तपासणी करुनच मागे घेणार...

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले लेखी उत्तर


नागपूर : काही महिन्यांपूर्वी जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) या गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) उपोषण करत असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला होता. तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जालना हे प्रचंड घडामोडींचं केंद्र बनलं होतं. अख्खा मराठा समाज या घटनेमुळे पेटून उठला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये (Maharashtra Assembly Winter Session 2023) लेखी उत्तर देत लाठीहल्ल्याच्या दिवशी घडलेल्या घटनेचा तपशील सादर केला.


मनोज जरांगे यांनी पहिले उपोषण मागे घेतले त्यावेळेस मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अशी सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतरही जरांगे सातत्याने ही मागणी करत आहेत. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देत कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिला आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर या घटनेमध्ये जवळपास ५० आंदोलक जखमी झाले असून ७९ पोलीस जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस सर्वाधिक जखमी झाल्याचे फडणवीस यांच्या निवेदनावरून स्पष्ट झालं आहे. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं त्यांनी लेखी निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले गुन्हे हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत हे या लेखी उत्तरावरून स्पष्ट झालं आहे.


मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने २ जानेवारी पर्यंतची मुदत मागून घेतली आहे. मात्र, जरांगे वारंवार ही मुदत २४ डिसेंबरपर्यंतच असल्याचे सांगत होते. काल त्यांनी यात आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. तर दुसरीकडे राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात सातत्याने वार पलटवार होत असतात. आज लाठीहल्ल्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेले देवेंद्र फडणवीस येत्या दिवसांत या सगळ्या प्रकरणावर काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे