Nagpur Winter session : सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : देवेंद्र फडणवीस

शेतकर्‍यांच्या प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न


नागपूर : नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter session) सुरुवात झाली. मात्र, कामकाज सुरु होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. गळ्यात संत्र्यांची माळ आणि हातात निषेधाचे पोस्टर्स घेऊन विरोधकांनी आंदोलन केले. या प्रकरणी अधिवेशन सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही. चाळीस तालुके हे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे दुष्काळी घोषित झाले. जे निकषात बसत नाहीत पण नुकसान झालेलं आहे, त्यांना राज्य सरकारने स्वतःच्या पैशातून मदतीचं आश्वासन दिलं आहे. १२०० मंडळांना दुष्काळसदृश घोषित करण्यात आलं आहे. दुष्काळी घोषित केलेल्यांना जे मिळणार आहे तेच दुष्काळसदृशांना मिळणार आहे, आम्ही कुठेही भेदभाव करत नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.


आमचं सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं आहे. मागच्या वर्षीदेखील माननीय मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या मदतीसाठी दिले. याहीवर्षी राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा वीस लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये २५ टक्के अंतरिम गेले आहेत. शेतकर्‍यांचं दुष्काळामुळे झालेलं नुकसान असो, अतिवृष्टी किंवा गारपीट किंवा अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असो या सगळ्या प्रकारच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी प्रक्रिया सुरु झालेली आहे.


पुढे ते म्हणाले, याव्यतिरिक्त दोन हेक्टरांऐवजी आता निकष तीन हेक्टरांचा करण्यात आला आहे. मागच्या वेळी एनडीआरएफच्या (NDRF) दुप्पट मदत आपण केली होती. म्हणजे नियमांपेक्षा नेहमीच जास्त देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आजही कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभं राहील आणि या अडचणीच्या परिस्थितीत शेतकर्‍याला पूर्ण मदत करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा