Election: रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजस्थानात सस्पेन्स कायम

नवी दिल्ली: तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रेवंत रेड्डी(revanth reddy) गुरूवारी तेलंगणाचे मुख्यमंक्षी म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा दुपारी १.०४ मिनिटांनी हैदराबादच्या विशाल एलबी स्टेडिययमध्ये रंगेल. यात एक लाख लोक सामील होण्याची शक्यता आहे. व्हीआयपीशिवाय रेवंत रेड्डी यांनी सामान्य लोकांनाही या कार्यक्रमात सामील होण्याचे खुले निमंत्रण दिले आहे.


गुरुवारी होत असलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी सामन्य लोकांना पाठवण्यात आलेल्या खुल्या निमंत्रण पत्रिकेत रेवंत रेड्डी यांनी लिहिले की, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तेलंगणामध्ये इंदिराम्मा राज्यम आणण्याची वेळ आली आहे. तसेच तेलंगणा जे विद्यार्थ्यांचा संघर्ष, शहीदांचे बलिदान आणि सोनिया गांधी यांच्या दृढ इच्छाशक्तीने बनले आहे. हे लोकशाहीमुख आणि पारदर्शी सरकार प्रदान करण्यासोतच कमकुवत वर्गा, दलित आणि आदिवासींच्या कल्याणासाठी सरकार बनवण्यासाठी गुरूवारी दुपारी १.०४ मिनिटांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाच्या रूपात शपथ घेतील. तुम्हाला सर्वांना यानिमित्ताने आमंत्रित केले जात आहे.



राजस्थानात मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम


एकीकडे तेलंगणामध्ये नवे मुख्यमंत्री शपथ घेतली तर दुसरीकडे राजस्थानात नव्या मुख्यमंत्रीचे नाव अद्याप ठरलेले नाही. बुधवारी दिवसभर यावर भाजपची चर्चा सुरू होती. रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बैठक झाली मात्र नावाची घोषणा झाली नाही.



छत्तीसगड आणि मध्य प्रदेशलाही प्रतीक्षा


राजस्थानप्रमाणेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही नव्या मुख्यमंत्र्याची प्रतीक्षा केली जात आहे. असे सांगितले जात आे की भाजपचे वरिष्ठ नेते आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची नावे फायनल करू शकतात.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे