Election: रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजस्थानात सस्पेन्स कायम

नवी दिल्ली: तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रेवंत रेड्डी(revanth reddy) गुरूवारी तेलंगणाचे मुख्यमंक्षी म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा दुपारी १.०४ मिनिटांनी हैदराबादच्या विशाल एलबी स्टेडिययमध्ये रंगेल. यात एक लाख लोक सामील होण्याची शक्यता आहे. व्हीआयपीशिवाय रेवंत रेड्डी यांनी सामान्य लोकांनाही या कार्यक्रमात सामील होण्याचे खुले निमंत्रण दिले आहे.


गुरुवारी होत असलेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी सामन्य लोकांना पाठवण्यात आलेल्या खुल्या निमंत्रण पत्रिकेत रेवंत रेड्डी यांनी लिहिले की, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तेलंगणामध्ये इंदिराम्मा राज्यम आणण्याची वेळ आली आहे. तसेच तेलंगणा जे विद्यार्थ्यांचा संघर्ष, शहीदांचे बलिदान आणि सोनिया गांधी यांच्या दृढ इच्छाशक्तीने बनले आहे. हे लोकशाहीमुख आणि पारदर्शी सरकार प्रदान करण्यासोतच कमकुवत वर्गा, दलित आणि आदिवासींच्या कल्याणासाठी सरकार बनवण्यासाठी गुरूवारी दुपारी १.०४ मिनिटांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाच्या रूपात शपथ घेतील. तुम्हाला सर्वांना यानिमित्ताने आमंत्रित केले जात आहे.



राजस्थानात मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम


एकीकडे तेलंगणामध्ये नवे मुख्यमंत्री शपथ घेतली तर दुसरीकडे राजस्थानात नव्या मुख्यमंत्रीचे नाव अद्याप ठरलेले नाही. बुधवारी दिवसभर यावर भाजपची चर्चा सुरू होती. रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बैठक झाली मात्र नावाची घोषणा झाली नाही.



छत्तीसगड आणि मध्य प्रदेशलाही प्रतीक्षा


राजस्थानप्रमाणेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही नव्या मुख्यमंत्र्याची प्रतीक्षा केली जात आहे. असे सांगितले जात आे की भाजपचे वरिष्ठ नेते आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची नावे फायनल करू शकतात.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही