कारभारी बदलले आणि कत्तलखान्यावर पडला छापा!

इंदिरानगर पोलिसांची कत्तलखान्यावर कारवाई; ११ गोवंशांना जीवदान


नाशिक : नाशिक येथील वडाळा गाव परिसरातील मुमताज नगर येथे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर ठिकाणी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकत ११ गोवंशाची सुटका केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू कुरेशी व इमरान शहा या दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळा गाव परिसरातील मुमताज नगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध कत्तलखाना सुरू असल्याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र सदर ठिकाणी पोलीस गेल्यास कुठलाही अवैध प्रकार आढळत नसल्याने पोलिसांना देखील प्रश्न पडत होता की सदर ठिकाणी कत्तलखाना असल्याबाबत माहिती तर मिळते परंतु प्रत्यक्षात काही आढळत नाही. यामागचे रहस्य अधिक गडद होत असतांना या कारवाईदरम्यान प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. ज्यामुळे ॲक्शन प्लॅन यशस्वी झाला व दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत ११ गोवंशाची सुटका करण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले.



सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस हवालदार पारणकर, शेख, खान, पोलीस नाईक परदेशी, जाधव, पाठक, नागरे, आदींनी ही कारवाई केली आहे.



कारभारी बदलले अन कारवाई झाली..!


नाशिक शहरात गोवंशाची सर्रास बेकायदेशीर कत्तल होत असल्याची खात्रीशीर माहिती एसीपी डीसीपी यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई होत नव्हती. इतकेच नाही तर तत्कालीन पोलिस आयुक्तांना देखील याबाबत अवगत केल्यानंतरही मिळालेल्या माहितीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत होते तथापी संदीप कर्णिक यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गोवंश संरक्षण करण्याच्या उद्देश्याने गेली बरीच वर्ष दुर्लक्षित ठेवले गेलेल्या वडाळा गावातील मुमताज नगर मधील या कत्तलखान्यावर कारवाई करून ११ गोवंशांना जीवदान मिळाल्याने गो वंश प्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत. भविष्यातही ही गती कायम राखली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

सोन्याला उत्पन्नाचा स्त्रोत बनवण्याची हीच वेळ आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांसाठी, सोने हे फक्त दागिने नसतात तर त्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात.

भारतातील पेट्रोल पंपांची संख्या १ लाखांवर, ९० टक्के पंप सरकारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन किरकोळ बाजार बनला आहे. पेट्रोलियम योजना आणि

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला