कारभारी बदलले आणि कत्तलखान्यावर पडला छापा!

इंदिरानगर पोलिसांची कत्तलखान्यावर कारवाई; ११ गोवंशांना जीवदान


नाशिक : नाशिक येथील वडाळा गाव परिसरातील मुमताज नगर येथे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर ठिकाणी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकत ११ गोवंशाची सुटका केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू कुरेशी व इमरान शहा या दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळा गाव परिसरातील मुमताज नगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध कत्तलखाना सुरू असल्याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र सदर ठिकाणी पोलीस गेल्यास कुठलाही अवैध प्रकार आढळत नसल्याने पोलिसांना देखील प्रश्न पडत होता की सदर ठिकाणी कत्तलखाना असल्याबाबत माहिती तर मिळते परंतु प्रत्यक्षात काही आढळत नाही. यामागचे रहस्य अधिक गडद होत असतांना या कारवाईदरम्यान प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. ज्यामुळे ॲक्शन प्लॅन यशस्वी झाला व दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत ११ गोवंशाची सुटका करण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले.



सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस हवालदार पारणकर, शेख, खान, पोलीस नाईक परदेशी, जाधव, पाठक, नागरे, आदींनी ही कारवाई केली आहे.



कारभारी बदलले अन कारवाई झाली..!


नाशिक शहरात गोवंशाची सर्रास बेकायदेशीर कत्तल होत असल्याची खात्रीशीर माहिती एसीपी डीसीपी यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई होत नव्हती. इतकेच नाही तर तत्कालीन पोलिस आयुक्तांना देखील याबाबत अवगत केल्यानंतरही मिळालेल्या माहितीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत होते तथापी संदीप कर्णिक यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गोवंश संरक्षण करण्याच्या उद्देश्याने गेली बरीच वर्ष दुर्लक्षित ठेवले गेलेल्या वडाळा गावातील मुमताज नगर मधील या कत्तलखान्यावर कारवाई करून ११ गोवंशांना जीवदान मिळाल्याने गो वंश प्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत. भविष्यातही ही गती कायम राखली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Rinku Rajguru : रिंकू राजगुरुनं दिली प्रेमाची कबुली, तुझ्या प्रेमात वेडी झालीये म्हणत केली 'ही' पोस्ट

मुंबई : महाराष्ट्राची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिंकू राजगूरू ही सोशल मिडियावर सक्रिय असून

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे सेक्रेड गेम्स,मँटो आणि ब्लॅक वॉरंट यांसारख्या

शरीर सुखाच्या मागणीला नकार देताच अभिनेत्यानं केली हत्या, मिरारोडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या

प्रसिद्ध मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये घडला 'हा' धक्कादायक प्रकार, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

आपण सोशल मिडिया वापरत असताना आपल्याला यावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या सोशल मिडियावर बऱ्याचदा

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातील 'हा' सदस्य बाहेर जाणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन सध्या दोरदार चर्चेत आहे. बिग बॉस मराठीला ७० दिवस झाले आहेत. तर, आता शेवटचे ३० दिवस