एकाच कुटुंबातील ४ लोकांनी केली सामूहिक आत्महत्या, वाराणसीमध्ये धक्कादायक घटना

वाराणसी: उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एकाच कुटुंबातील चार लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण गुरूवारी संध्याकाळी उशिरा समोर आले. आत्महत्या केलेल्यांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आत्महत्या कशामुळे केली याबाबतचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.


मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या कैलाश भवनच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. येथे एक महिला आणि तीन पुरुषांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक आंध्र प्रदेशचे राहणारे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. आता संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली जात आहे. पोलीस कैलाश भवनात चौकशी करत आहे.


पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही बोलावले. सर्व मृतदेह हाती घेण्यात आले. या घटनेबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू