NCRB Report: देशात अपहरणाची १ लाखाहून अधिक प्रकरणे, या राज्यात सर्वाधिक आत्महत्या

  97

नवी दिल्ली: भारतात २०२२ या वर्षात अपहरणाची एक लाखाहून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आली. या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या स्ानावर आहे. एनसीआरबीच्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली.


ऱाष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार देशात अपहरणाची दिवसाला २९४हून अधिक तर प्रत्येक तासाला १२ हून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आले. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार २०२२मध्ये देशात प्रति एक लाख लोकसंख्येनुसार गुन्ह्याचा दर ७.८ टक्के इतका होता. तर अशा गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचा दर ३६.४ टक्के होता.



कुठे किती प्रकरणे?


केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीच्या माहितीनुसार २०२२मध्ये देशात अपहरणाची १,०७,५८८ प्रकरणे दाखल झाली. गेल्या वर्षी हा आकडा १०१,७०७ आणि २०२०मध्ये ८४,८०५ होता. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दिल्लीत २०२२मध्ये अपहरणाची ५६४१, २०२१मध्ये ५,५२७ आणि २०२०मध्ये ४,०६२ प्रकरणे दाखल करण्यात आली. उत्तर प्रदेशात २०२२मध्ये अपहरणाचे सर्वाधिक १६, २६२ प्रकरणे दाखल झाली.



आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक कुठे?


एनसीआरबीच्या ताज्या रिपोर्टनुसार सिक्कीममध्ये आत्महत्येचा दर सर्वाधिक आहे. रिपोर्टनुसार सिक्कीमध्ये प्रति एक लाख लोकसंख्येनुसार आत्महत्येचा दर ४३.१ टक्के इतका आहे. यानंतर अंदमान आणि निकोबार बेटावर ४२.८ टक्के, पाँडिचेरीमध्ये २९.७ टक्के, केरळमध्ये २८.५ टक्के आणि छत्तीसगडमध्ये २८.२ टक्के आहे.



देशात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण


देशभरात २०२२मध्ये एकूण १,७०,९२४ जणांनी आत्महत्या केल्या. रिपोर्टनुसार सिक्कीमध्ये २०२२मध्ये २९३ आत्महत्येची प्रकरणे समोर आली. २०२१च्या तुलनेत ही संख्या २७ ने अधिक आहे. सिक्कीममध्ये एकूण २२६ पुरुष आणि ६७ महिलांनी आत्महत्या केली. गेल्या वर्षी या राज्यात आत्महत्येचे हे अधिक प्रमाण बेरोजगारीमुळे झाले.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं