INDIA Alliance Meeting : घमंडियांची बैठक की रुसवेफुगवे?

एक आजारी, दुसरा नाराज तर तिसर्‍याला माहितच नाही!


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत जे खुलासे केले आहेत, त्यावरुन इंडिया ही आघाडी (INDIA Alliance) नव्हे तर मतभेद असूनही एकत्र असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, हेच स्पष्ट होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पहिलीच बैठक बोलावली आहे. पण या बैठकीसाठी महत्त्वाच्या नेत्यांच्या अुनपस्थितीची कारणे मजेशीर आहेत.


आज दिल्ली येथे खरगेंनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar)उपस्थित राहू शकणार नाहीत. नितीश कुमार आजारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) नाराज असल्याचे देखील संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बैठकीआधीच इंडिया आघाडीत रुसवेफुगवे असल्याचं दिसून येत आहे.


बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तर आपल्याला बैठकीबद्दल कल्पनाच नसल्याचे सांगितले. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये ६ ते ७ दिवसांचा कार्यक्रम आहे. मी इतर योजना देखील केल्या आहेत. आता जर त्यांनी मला बैठकीसाठी बोलावले तर मी माझे कार्यक्रम कसे बदलता येईल?, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी असमर्थता दर्शवली आहे.


तर दुसरीकडे आघाडीचा धर्म म्हणून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. पण मुख्य नेतेच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याने ही बैठक कितपत यशस्वी होईल, हा प्रश्नच आहे. शिवाय काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीतील काँग्रेसचं वर्चस्व कमी झालं आहे, त्यामुळे वाटाघाटी करताना घटक पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

चारही पीठांचे शंकराचार्य १९ वर्षांनी एकाच व्यासपीठावर येणार

दिल्लीत गोमाता रक्षणासाठी १० मार्चला कार्यक्रम नवी दिल्ली: ज्योतिषपीठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद

राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

कर्नाटकातही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळला नवी दिल्ली  : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी

ओडिशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट बंद

ओडिशा राज्याचा निर्णय नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ओडिशा सरकारने गुरुवारी राज्यात बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, खैनी

जागतिक अर्थव्यवस्थेची माहितीही महत्वाची

विरोधकांच्या टीके फडणवीस यांचे उत्तरला नवी दिल्ली : जगातील राजकीय नेते इथे आहे. जगातील उद्योगांचे नेतृत्व

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन