Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन गटांत गोळीबार, १३ जणांचा मृत्यू

इंफाळ: मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या गोळीबारात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना सोमवारी दुपारी लीथू गावात घडली.


म्यानमारच्या दिशेने जाणाऱ्या या गटावर परिसरातील एका गटाने जोरदार हल्ला केला. घटनास्थळी सुरक्षादलाला १३ जणांचे मृतदेह सापडले. याची अद्याप ओळख पटलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की हे स्थानिक निवासी नव्हते अशी प्राथमिक माहिती आहे. तेंगनापौल जिल्हा म्यानमारच्या सीमेवरच आहे.



मणिपूर हिंसा


या वर्षी मे महिन्यात या राज्यात हिंसाचाराची आग पेटली होती. यानंतर हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आणि तब्बल १७५ लोकांचा जीव गेला. अधिकतर भागामध्ये आजही इंटरनेट बंद आहे. हिंसादरम्यान दोन महिलांसोबत झालेल्या अपमानजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी याची निंदा केली होती तसेच न्याय मिळेल असाही विश्वास दिला होता.


या हिंसाचाराशी संबंधित सीबीआय तपास करत आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहे. संसदेत असो वा निवडणूक रॅलीदरम्यान या हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन