Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन गटांत गोळीबार, १३ जणांचा मृत्यू

इंफाळ: मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या गोळीबारात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना सोमवारी दुपारी लीथू गावात घडली.


म्यानमारच्या दिशेने जाणाऱ्या या गटावर परिसरातील एका गटाने जोरदार हल्ला केला. घटनास्थळी सुरक्षादलाला १३ जणांचे मृतदेह सापडले. याची अद्याप ओळख पटलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की हे स्थानिक निवासी नव्हते अशी प्राथमिक माहिती आहे. तेंगनापौल जिल्हा म्यानमारच्या सीमेवरच आहे.



मणिपूर हिंसा


या वर्षी मे महिन्यात या राज्यात हिंसाचाराची आग पेटली होती. यानंतर हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आणि तब्बल १७५ लोकांचा जीव गेला. अधिकतर भागामध्ये आजही इंटरनेट बंद आहे. हिंसादरम्यान दोन महिलांसोबत झालेल्या अपमानजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी याची निंदा केली होती तसेच न्याय मिळेल असाही विश्वास दिला होता.


या हिंसाचाराशी संबंधित सीबीआय तपास करत आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहे. संसदेत असो वा निवडणूक रॅलीदरम्यान या हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू