राजकारण सोडण्याच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी घेतली भेट

ऍड. सहाणे यांच्यासारख्या उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तींची विद्यमान राजकारणाला गरज:आ. भारतीय


नाशिक (प्रतिनिधी)- विद्यमान राजकारणाचा घसरलेला दर्जा लक्षात घेता उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्वांनी राजकारणात सक्रिय होणे ही लोकशाहीची अपरिहार्यता आहे.पक्ष कुठलाही असेल, प्रत्येक पक्षाला अशा कार्यकर्त्यांची, नेत्यांची आज गरज आहे आणि म्हणूनच राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवू पाहणारे नाशिकच्या राजकारणातील उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि मितभाषी ऍंड शिवाजी सहाणे यांची सदिच्छा भेटू घेऊन त्यांचे मन आणि मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आ. श्रीकांत भारतीय यांनी आज नाशिकमध्ये दिले.


शनिवारी सायंकाळी आ. भारतीय नाशिक दौऱ्यावर आले असता, कुठलेही नियोजन नसतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करीत असलेले ऍड शिवाजी सहाणे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांसोबत जेवण केल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडून विविध चर्चेला उधाण आले आहे. या अनुषंगाने आ. भारतीय यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.


आ. श्रीकांत भारतीय म्हणाले की, ऍड शिवाजी सहाणे हे भारतीय कुटुंबाचे जुने स्नेही आहे सहाणे, भारतीय कुटुंबियांमध्ये पारिवारिक स्नेहबंध आहेत. याशिवाय ते स्वतः एक उच्च शिक्षित, सुसंकृत तत्ववादी राजकारणी म्हणून ओळखले जातात. आमची मैत्री राजकारणा पलीकडची असून दोन्ही बाजूने आम्ही ती जपत आहोत.


ऍड सहाणे यांचा उच्च शिक्षित सुसंकृतपणा आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या वैशिष्ट्यामुळेच गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघात ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतांनाही भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता.ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांनी राजकारणात सक्रिय असावे, त्यांच्या सारख्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची राजकारणाला गरज आहे. हा संदेश देणे एवढाच या भेटीचा उद्देश होता आणि आहे.

Comments
Add Comment

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर