गगनयान मिशनद्वारे ४ अंतराळवीर जाणार अंतराळात, इस्त्रो प्रमुखांसाठी हे आहे मोठे चॅलेंज

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे(isro) अध्यक्ष एस सोमनाथ शनिवारी म्हणाले की भारताच्या पहिल्या मानव अंतराळ यान गगनयानसाठी(gaganyan) निवडण्यात आलेले अंतराळवीर तयार आहे आणि ते २०२५ची प्रतीक्षा करत आहेत. गगनयान कार्यक्रमाचे लक्ष्य हे २०२५मध्ये तीन दिवसांच्या मिशनसाठी चार अंतराळवींरांना अंतराळात पाठवणे आणि सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत घेऊन येणे.



काय आहे या मिशनचे मोठे आव्हान?


सोमनाथ म्हणाले, इस्त्रो हे मिशन यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. पहिल्या मिशनसाठी आम्ही त्या चार जणांना निवडले आहे. आमचा प्रयत्न आहे की २०२५पर्यंत त्यांना अंतराळात पाठवले जाईल आणि सुरक्षितरित्या परत आणले जाईल. त्यांना सुरक्षितरित्या पृथ्वीवर आणणे हे या मिशनचा महत्त्वाचा उद्देश आहे.



आम्ही दिवस रात्र काम करत आहोत


सोमनाथ पंडित दीनदयाळ उर्जा विश्वविद्यालयाच्या ११व्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. गगनयान मिशन यशस्वी करण्यासाठी येणाऱ्या दिवसांत बऱ्याच तांत्रिक गोष्टी विकसित करणे गरजेचे आहे. इस्त्रोमध्ये आम्ही हे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहोत. येणाऱ्या दिवसांत मानवरहित अनेक मिशन पाहू आणि अखेरीस भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल. यासाठी अंतराळवीर आधीपासूनच तयार आहेत.


इस्त्रो एक अंतराळ स्टेशन बनवण्याबाबतही विचार करत आहे जे वैज्ञानिक तसेच तांत्रिक प्रगती तसेच उद्योगांसाठी विविध क्षेत्रात काम करण्यासाठी गरजेचे आहे. चांद्रयान ३ बाबत बोलताना सोमनाथ म्हणाले, भारताकडे या श्रेणीच्या
उच्च प्रोद्यौगिकी योजना पूर्ण करण्यासाठीचा आत्मविश्वास आहे. आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा पहिला देश बनलो आहोत आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनलो आहोत.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने