गगनयान मिशनद्वारे ४ अंतराळवीर जाणार अंतराळात, इस्त्रो प्रमुखांसाठी हे आहे मोठे चॅलेंज

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे(isro) अध्यक्ष एस सोमनाथ शनिवारी म्हणाले की भारताच्या पहिल्या मानव अंतराळ यान गगनयानसाठी(gaganyan) निवडण्यात आलेले अंतराळवीर तयार आहे आणि ते २०२५ची प्रतीक्षा करत आहेत. गगनयान कार्यक्रमाचे लक्ष्य हे २०२५मध्ये तीन दिवसांच्या मिशनसाठी चार अंतराळवींरांना अंतराळात पाठवणे आणि सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत घेऊन येणे.



काय आहे या मिशनचे मोठे आव्हान?


सोमनाथ म्हणाले, इस्त्रो हे मिशन यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. पहिल्या मिशनसाठी आम्ही त्या चार जणांना निवडले आहे. आमचा प्रयत्न आहे की २०२५पर्यंत त्यांना अंतराळात पाठवले जाईल आणि सुरक्षितरित्या परत आणले जाईल. त्यांना सुरक्षितरित्या पृथ्वीवर आणणे हे या मिशनचा महत्त्वाचा उद्देश आहे.



आम्ही दिवस रात्र काम करत आहोत


सोमनाथ पंडित दीनदयाळ उर्जा विश्वविद्यालयाच्या ११व्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. गगनयान मिशन यशस्वी करण्यासाठी येणाऱ्या दिवसांत बऱ्याच तांत्रिक गोष्टी विकसित करणे गरजेचे आहे. इस्त्रोमध्ये आम्ही हे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहोत. येणाऱ्या दिवसांत मानवरहित अनेक मिशन पाहू आणि अखेरीस भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल. यासाठी अंतराळवीर आधीपासूनच तयार आहेत.


इस्त्रो एक अंतराळ स्टेशन बनवण्याबाबतही विचार करत आहे जे वैज्ञानिक तसेच तांत्रिक प्रगती तसेच उद्योगांसाठी विविध क्षेत्रात काम करण्यासाठी गरजेचे आहे. चांद्रयान ३ बाबत बोलताना सोमनाथ म्हणाले, भारताकडे या श्रेणीच्या
उच्च प्रोद्यौगिकी योजना पूर्ण करण्यासाठीचा आत्मविश्वास आहे. आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा पहिला देश बनलो आहोत आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनलो आहोत.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार