गगनयान मिशनद्वारे ४ अंतराळवीर जाणार अंतराळात, इस्त्रो प्रमुखांसाठी हे आहे मोठे चॅलेंज

  107

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे(isro) अध्यक्ष एस सोमनाथ शनिवारी म्हणाले की भारताच्या पहिल्या मानव अंतराळ यान गगनयानसाठी(gaganyan) निवडण्यात आलेले अंतराळवीर तयार आहे आणि ते २०२५ची प्रतीक्षा करत आहेत. गगनयान कार्यक्रमाचे लक्ष्य हे २०२५मध्ये तीन दिवसांच्या मिशनसाठी चार अंतराळवींरांना अंतराळात पाठवणे आणि सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत घेऊन येणे.



काय आहे या मिशनचे मोठे आव्हान?


सोमनाथ म्हणाले, इस्त्रो हे मिशन यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. पहिल्या मिशनसाठी आम्ही त्या चार जणांना निवडले आहे. आमचा प्रयत्न आहे की २०२५पर्यंत त्यांना अंतराळात पाठवले जाईल आणि सुरक्षितरित्या परत आणले जाईल. त्यांना सुरक्षितरित्या पृथ्वीवर आणणे हे या मिशनचा महत्त्वाचा उद्देश आहे.



आम्ही दिवस रात्र काम करत आहोत


सोमनाथ पंडित दीनदयाळ उर्जा विश्वविद्यालयाच्या ११व्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. गगनयान मिशन यशस्वी करण्यासाठी येणाऱ्या दिवसांत बऱ्याच तांत्रिक गोष्टी विकसित करणे गरजेचे आहे. इस्त्रोमध्ये आम्ही हे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहोत. येणाऱ्या दिवसांत मानवरहित अनेक मिशन पाहू आणि अखेरीस भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल. यासाठी अंतराळवीर आधीपासूनच तयार आहेत.


इस्त्रो एक अंतराळ स्टेशन बनवण्याबाबतही विचार करत आहे जे वैज्ञानिक तसेच तांत्रिक प्रगती तसेच उद्योगांसाठी विविध क्षेत्रात काम करण्यासाठी गरजेचे आहे. चांद्रयान ३ बाबत बोलताना सोमनाथ म्हणाले, भारताकडे या श्रेणीच्या
उच्च प्रोद्यौगिकी योजना पूर्ण करण्यासाठीचा आत्मविश्वास आहे. आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा पहिला देश बनलो आहोत आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनलो आहोत.

Comments
Add Comment

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर