गगनयान मिशनद्वारे ४ अंतराळवीर जाणार अंतराळात, इस्त्रो प्रमुखांसाठी हे आहे मोठे चॅलेंज

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे(isro) अध्यक्ष एस सोमनाथ शनिवारी म्हणाले की भारताच्या पहिल्या मानव अंतराळ यान गगनयानसाठी(gaganyan) निवडण्यात आलेले अंतराळवीर तयार आहे आणि ते २०२५ची प्रतीक्षा करत आहेत. गगनयान कार्यक्रमाचे लक्ष्य हे २०२५मध्ये तीन दिवसांच्या मिशनसाठी चार अंतराळवींरांना अंतराळात पाठवणे आणि सुरक्षितरित्या पृथ्वीवर परत घेऊन येणे.



काय आहे या मिशनचे मोठे आव्हान?


सोमनाथ म्हणाले, इस्त्रो हे मिशन यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. पहिल्या मिशनसाठी आम्ही त्या चार जणांना निवडले आहे. आमचा प्रयत्न आहे की २०२५पर्यंत त्यांना अंतराळात पाठवले जाईल आणि सुरक्षितरित्या परत आणले जाईल. त्यांना सुरक्षितरित्या पृथ्वीवर आणणे हे या मिशनचा महत्त्वाचा उद्देश आहे.



आम्ही दिवस रात्र काम करत आहोत


सोमनाथ पंडित दीनदयाळ उर्जा विश्वविद्यालयाच्या ११व्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. गगनयान मिशन यशस्वी करण्यासाठी येणाऱ्या दिवसांत बऱ्याच तांत्रिक गोष्टी विकसित करणे गरजेचे आहे. इस्त्रोमध्ये आम्ही हे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहोत. येणाऱ्या दिवसांत मानवरहित अनेक मिशन पाहू आणि अखेरीस भारतीयांना अंतराळात पाठवले जाईल. यासाठी अंतराळवीर आधीपासूनच तयार आहेत.


इस्त्रो एक अंतराळ स्टेशन बनवण्याबाबतही विचार करत आहे जे वैज्ञानिक तसेच तांत्रिक प्रगती तसेच उद्योगांसाठी विविध क्षेत्रात काम करण्यासाठी गरजेचे आहे. चांद्रयान ३ बाबत बोलताना सोमनाथ म्हणाले, भारताकडे या श्रेणीच्या
उच्च प्रोद्यौगिकी योजना पूर्ण करण्यासाठीचा आत्मविश्वास आहे. आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा पहिला देश बनलो आहोत आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनलो आहोत.

Comments
Add Comment

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर