Assembly election: जनता-जर्नादनाला नमन, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकीवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: राजस्थान(rajasthan), मध्य प्रदेश(madhya pradesh), राजस्थान(rajasthan) आणि तेलंगणा(telangana) विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की जनता-जनार्दनाला नमन!. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले की भारताच्या जनतेचा विश्वास केवळ आणि केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणात आहे. त्यांचा विश्वास भाजपवर आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपवर आपला स्नेह, विश्वास आणि आशीर्वाद बरसण्यासाठी या सर्व राज्यांच्या कुटुंबियांचे खासकरून माता-भगिनी-मुलींचे, आमच्या तरूण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना विश्वास देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी निरंतर अथक परिश्रम करत राहू.


या निमित्ताने पक्षाच्या सर्व परिश्रमी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी अद्भुत उदाहरण सादर केले आहे. भाजपचा विकास आणि गरीब कल्याणकारी योजना ज्या पद्धतीने लोकांमध्ये पोहोचवल्या त्याचे कौतुक जितके केले जावे कमी. आम्ही विकसित भारताचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाहीये. तसेच थकायचेही नाही. आम्हाला भारताला विजयी बनवायचे आहे. आज या दिशेने आम्ही पुन्हा एकदा सशक्त पाऊल उचलले आहे.


 


तेलंगणाबाबत काय म्हणाले मोदी?


पंतप्रधान मोदी म्हणाले, तेलंगणामधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो भाजपला समर्थन देण्यासाीठी धन्यवाद. गेल्या काही वर्षांपासून हे समर्थन वाढत आहे. येणाऱ्या काळातही हेच चालू राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे. आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मी प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो.



कोणला किती मिळाल्या जागा?


संध्याकाळी चार वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील २३० जागांपैकी भाजप १० जागांवर विजयी तर १५६ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने आतापर्यंत तीन जागा जिंकल्यात आणि ६० जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहे.


राजस्थानात भाजपने ५३ जागा जिंकल्या आहेत तर ६२ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने आतापर्यंत २७ जागा जिंकल्या आहे आणि ते ४२ जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानात १९९ जागा आहेत.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली