Rajesh Tope Car : राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड का केली?

जालना : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर आज अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. जालना (Jalana) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली टोपे यांची गाडी पार्क केलेली असताना या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात गाडीची समोरची काच फुटली. गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली.


हल्ल्यावेळी टोपे यांचा चालक गाडीमध्येच उपस्थित होता. शिवाय चार ते पाच जणांच्या टोळक्याने गाडीवर दगडफेक केल्याचे त्याने सांगितले. हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.


जालन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानिमित्ताने राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. त्याचवेळी त्यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी असताना गाडीच्या समोरील भागावर दगडफेक करण्यात आली. राजेश टोपे यांच्या गाडीवर नेमका कुणी हल्ला केला हे अद्याप समोर आलेलं नाही.


मराठा आरक्षणासारख्या (Maratha reservation) धगधगत्या मुद्दयामुळे मराठवाडा आणि विशेषतः जालना जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. जालन्यात सध्या जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यावेळीच राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोहोचून पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा