Rajesh Tope Car : राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड का केली?

जालना : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर आज अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. जालना (Jalana) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली टोपे यांची गाडी पार्क केलेली असताना या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात गाडीची समोरची काच फुटली. गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली.


हल्ल्यावेळी टोपे यांचा चालक गाडीमध्येच उपस्थित होता. शिवाय चार ते पाच जणांच्या टोळक्याने गाडीवर दगडफेक केल्याचे त्याने सांगितले. हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.


जालन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानिमित्ताने राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. त्याचवेळी त्यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी असताना गाडीच्या समोरील भागावर दगडफेक करण्यात आली. राजेश टोपे यांच्या गाडीवर नेमका कुणी हल्ला केला हे अद्याप समोर आलेलं नाही.


मराठा आरक्षणासारख्या (Maratha reservation) धगधगत्या मुद्दयामुळे मराठवाडा आणि विशेषतः जालना जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. जालन्यात सध्या जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यावेळीच राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोहोचून पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून