Sridevi Biopic : सिनेमा आल्यास श्रीदेवीच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल अशी बोनी कपूरला भीती!

'कधीच येणार नाही जीवनपट!' असं का म्हणाले बोनी कपूर?


मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) हवाहवाई आणि पहिली महिला सुपरस्टार असलेली श्रीदेवी (Sridevi) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी तिचं निधन झालं. मात्र त्यानंतरही तिचे सुपरहिट सिनेमे प्रेक्षक आवडीने पाहतात, तिची गाणी चाहते कायम गुणगुणत असतात. याच श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तिच्या आयुष्यावर आधारलेला एक जीवनपट (Biopic) यावा अशी चाहत्यांची प्रचंड इच्छा होती. परंतु श्रीदेवीचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी यावर स्पष्ट शब्दांत केलेल्या भाष्याने चाहते काहीसे निराश झाले आहेत.


श्रीदेवीचा मृत्यू हा रहस्यमय पद्धतीने झाला होता, असं तिच्या अनेक चाहत्यांना वाटतं. त्यामुळे तिच्या बालपणापासून ते अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास आणि नंतर अचानक आलेला मृत्यू हे सर्व चित्रपटरुपी समोर यावं अशी चाहत्यांची इच्छा होती. यावर चित्रपट येणार अशी चर्चाही रंगली होती. मात्र, बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या जीवनपटासाठी स्पष्ट नकार दिला आहे.


बोनी कपूर नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाले, "श्रीच्या आयुष्यावर मी कधीही सिनेमा बनवणार नाही. श्रीदेवीच्या बायोपिकसाठी मला अनेकांनी विचारलं आहे. पण आयुष्यात कधीच मी श्रीच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार नाही. श्रीदेवीवर सिनेमा बनवणं हा माझा वैयक्तिक विषय आहे. श्रीदेवीच्या आयुष्यावर किंवा तिच्याबद्दल काही जण पुस्तक लिहित आहेत. तिच्या आयुष्यावर एखादं पुस्तक लिहिण्याची देखील माझी इच्छा नाही".


बोनी आणि श्रीदेवी यांनी १९९६ साली लग्न केले होते. मात्र, त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल लोकांना अजून फारशी माहिती नाही. यावर बोनी कपूर म्हणाले,"श्रीदेवी आणि माझी लव्हस्टोरी ही आमची वैयक्तिक बाब आहे. श्री ही कायमच माझ्या जवळ असणार आहे. आम्ही कसे एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि संसार थाटला ही आमची वैयक्तिक बाब आहे. यावर एखादी कलाकृती होऊ नये". बोनी कपूर यांच्या या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.


विशेष म्हणजे, श्रीदेवी दुबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलच्या बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. ती बुडल्याचे कोणाच्याच लक्षात आले नव्हते. तिच्या मृत्यूचे नेमके कारण हे अजूनही एक गूढ आहे. जर श्रीदेवीच्या जीवनावर सिनेमा किंवा पुस्तक आलं तर त्यात तिच्या मृत्यूवरही भाष्य केलं जाईल अशी भीती बोनी कपूर यांना वाटत असावी आणि त्यामुळेच ते वैयक्तिक बाब सांगून चरित्रपटास नकार देत असतील, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

Comments
Add Comment

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या