Narayan Murthy : नारायण मूर्ती आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत; म्हणाले, 'सरकारी मोफत सुविधांचा...

बंगळुरू : इन्फोसिस (Infosys) सारखी मोठी आयटी कंपनी (IT Company) आणि प्रचंड पैसा असतानाही साध्या राहणीमानाने जगणारे नारायण मूर्ती (Narayan Murthy) काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. 'तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम केले पाहिजे, तर देशाची कार्य उत्पादकता वाढेल' असं ते म्हणाले. परंतु त्यांचे हे विधान अनेकांना रुचले नव्हते. त्यावर झालेल्या टीकेनंतर आता नारायण मूर्ती पुन्हा एकदा एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.


नारायण मूर्ती बंगळुरू येथील टेक समिट २०२३ (Tech Summit 2023) कार्यक्रमात बोलत होते. यात त्यांनी निवडणुकीत राजकीय पक्षांनी मोफत सुविधा (Subsidies) देण्याच्या आश्वासनांवर भाष्य केले. नारायण मूर्ती म्हणाले की, काहीही विनामूल्य देऊ नये. सरकारकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि अनुदानाचा लाभ घेणाऱ्या लोकांनी समाजाच्या भल्यासाठी हातभार लावावा, अशी सूचनाही त्यांनी केली. भारतासारख्या गरीब देशाला समृद्ध राष्ट्र बनवण्यासाठी उदारमतवादी भांडवलशाही हा एकमेव उपाय असल्याचे मूर्ती यांनी सांगितले.


उदाहरण देताना ते म्हणाले की, मोफत वीज देणार असं जर सरकार म्हणत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी हेही सांगायला हवे की जर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्क्यांपर्यंत पोहोचली तर आम्ही तुम्हाला या सुविधा देऊ.


पुढे ते म्हणाले, मी मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही, कारण मी देखील एकेकाळी गरीब पार्श्वभूमीतून आलो होतो. परंतु मला वाटते की मोफत सुविधांचा लाभ घेत असलेल्या लोकांकडून आपण त्या बदल्यात काहीतरी अपेक्षा केली पाहिजे. त्यांच्या स्वतःच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काहीतरी योगदान दिले पाहिजे, असं वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा