UNGAमध्ये इस्त्रायलविरोधात आला प्रस्ताव, भारताने दिले समर्थन

नवी दिल्ली: इस्त्रायल(israel) आणि हमास(hamas) यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षात युद्धविरामादरम्यान संयुक्त राष्ट्र(UNA) महासभेत महत्त्वपूर्ण प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. यात मागणी कऱण्यात आली आहे की इस्त्रायलने गोलान हाईट्सवरील आपले नियंत्रण सोडावे. भारताने या प्रस्तावाला समर्थन दिले आहे.



९१ देशांनी दिले समर्थन


संयुक्त राष्ट्राने हा प्रस्ताव इजिप्तमध्ये सादर केला होता. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ ९१ देशांनी मतदान केले होते. यात भारताचाही समावेश होता. या प्रस्तावात म्हटले होते की, यूएनजीए आणि सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव लक्षात घेता इस्त्रायलने सीरियाई गोलन हाईट्सवरील आपले नियंत्रण सोडावे. इस्त्रायलने १९६७मध्ये गोलन हाईट्सवर नियंत्रण मिळवले होते.



भारताशिवाय कोणत्या देशांनी केले समर्थन


प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या देशांमध्ये भारताशिवाय बांगलादेश, भूतान, चीन, मलेशिया, मालदीव, नेपाळ, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश होता. तर जे देश यात अनुपस्थित राहिले त्यात युरोपीय संघाचे सदस्य, अन्य युरोपीय देश आणि जपानचा समावेश होता.



इस्त्रायलच्या भूमिकेबाबत चिंता


न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार, प्रस्तावात इस्त्रायलच्या भूमिकेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. प्रस्तावात घोषित करण्यात आले की इस्त्रायलचा देश सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव ४९७(१९८१)चे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे. यात निर्णय घेण्यात आला की निय



काय आहे गोलन हाईट्स?


गोलन हाईट्स पश्चिम सीरिया स्थित एक डोंगराळ भाग आहे. इस्त्रायलने १९६७मध्ये सीरियासोबत सहा दिवसांच्या युद्धानंक गोलन हाईट्सवर नियंत्रण मिळवले होते. त्यावेळेस त्या परिसरात राहणारे अनेक सीरिययन अरब लोक आपले घर सोडून गेले होते.


सीरियाने १९७३मध्ये मध्यपूर्व युद्धादरम्यान गोलन हाईट्सवर पुन्हा कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. १९७४मध्ये दोन्ही देशांनी या भागात युद्धविराम लागू केला. संयुक्त राष्ट्राचे सैन्य १९७४पासून युद्धविराम रेषेवर तैनात आहे. १९८१मध्ये इस्त्रायलन गोलन हाईट्स आपल्या भागात मिसळण्याची एकतर्फी घोषणा केली होती. मात्र इस्त्रायलच्या या पावलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली नव्हती.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या