Mobile: मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

  496

मुंबई: लोकांच्या मनात मोबाईल फोनच्या(mobile phone) बॅटरीबाबत(battery) अनेक प्रश्न येत असतात. जसे मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला(charging) लावून ठेवणे योग्य आहे का? असे केल्याने फोन खराब होऊ शकतो का? सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य आहे की अयोग्य? अशा प्रश्नांची यादी तुमच्याकडेही असेल. तसेच मोबाईल किती टक्के चार्ज करणे गरजेचे असते. तसेच चार्ज करण्याची योग्य वेळ कधी असते या अनेक प्रश्नांवर आज तुम्हाला या लेखातून उत्तरे मिळणार आहेत.


लोकांना फोनची बॅटरी आणि त्याच्या चार्जिंगबाबत खूप चिंता असते. कारण याआधी अनेकदा मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बरेचजण याबाबत सतर्क आहेत. दरम्यान, जोपर्यंत डिव्हाईसमध्ये कोणतेही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नसेल अथवा कोणताही एक्सटर्नल प्रॉब्लेम नसेल तर डिव्हाईसमध्ये आग लागत नाही.



रात्रभर फोन चार्ज केल्याने बॅटरी ओव्हरलोड होते का?


तज्ञांच्या मते आजकाल नवे स्मार्टफोन खूपच स्मार्ट असतात ते ओव्हरलोडची समस्या येऊ देत नाहीत. फोनमधील एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह चिप्स सुनिश्चित करतात की टॅबलेट, फोन अथवा लॅपटॉप ओव्हरलोड होणार नाही. जसेही इंटरनल लिथियम आर्यन बॅचरी आपल्या कॅपॅसिटीच्या १०० टक्क्यांपर्यंत पोहोचते बॅटरीचे चार्जिंग बंद होते. मात्र जर तुम्ही रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवाल तर मोबाईल फोन काही प्रमाणात एनर्जी कंझ्युम करेल. जेव्हा फोनची बॅटरी ९९ टक्क्यांवर येते तेव्हा मोबाईल पुन्हा चार्ज होऊ लागतो. यामुळे फोनच्या आयुष्यमानावर परिणाम होतो.



काय करणे योग्य?


याबाबत चिंता करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा फोनला चार्जिंगला लावा आणि चार्जिंग झाल्यानंतर काढून टाका अथवा रात्रीत जर तुमची झोप उघडली तर फोन चार्जिंगवरून काढा. यासाठी तुम्ही स्मार्ट प्लगचा वापर करू शकता ज्यामुळे काही वेळाने चार्जिंग बंद होऊन जाते.

Comments
Add Comment

मुंबईतील सण उत्सवांसाठी मुंबई पोलीस सज्ज : सणासुदीत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : मुंबईमध्ये सण, उत्सवांचा हंगाम सुरु झाला आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी आणि

एअर इंडिया एक्सप्रेसची ‘फ्रीडम सेल’ घोषणा

मुंबई : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने “फ्रीडम सेल”ची घोषणा करत प्रवाशांना

कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद

कोल्हापूर : कोल्हापुरच्या देवी अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस मूर्तीवर

लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि आता अपात्र जाहीर झालेल्या २६ लाख जणींची चौकशी होणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वर्षभरापासून एक कोटी पेक्षा जास्त

सोमवारपासून अतिमुसळधार

मुंबई : पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. १२ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा

म. वैतरणा जलाशयावरील १०० मेगावॉट वीजनिर्मितीला गती

प्रकल्पाला सरकारची मंजुरी मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयावर २०