Mobile: मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

मुंबई: लोकांच्या मनात मोबाईल फोनच्या(mobile phone) बॅटरीबाबत(battery) अनेक प्रश्न येत असतात. जसे मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला(charging) लावून ठेवणे योग्य आहे का? असे केल्याने फोन खराब होऊ शकतो का? सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य आहे की अयोग्य? अशा प्रश्नांची यादी तुमच्याकडेही असेल. तसेच मोबाईल किती टक्के चार्ज करणे गरजेचे असते. तसेच चार्ज करण्याची योग्य वेळ कधी असते या अनेक प्रश्नांवर आज तुम्हाला या लेखातून उत्तरे मिळणार आहेत.


लोकांना फोनची बॅटरी आणि त्याच्या चार्जिंगबाबत खूप चिंता असते. कारण याआधी अनेकदा मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बरेचजण याबाबत सतर्क आहेत. दरम्यान, जोपर्यंत डिव्हाईसमध्ये कोणतेही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नसेल अथवा कोणताही एक्सटर्नल प्रॉब्लेम नसेल तर डिव्हाईसमध्ये आग लागत नाही.



रात्रभर फोन चार्ज केल्याने बॅटरी ओव्हरलोड होते का?


तज्ञांच्या मते आजकाल नवे स्मार्टफोन खूपच स्मार्ट असतात ते ओव्हरलोडची समस्या येऊ देत नाहीत. फोनमधील एक्स्ट्रा प्रोटेक्टिव्ह चिप्स सुनिश्चित करतात की टॅबलेट, फोन अथवा लॅपटॉप ओव्हरलोड होणार नाही. जसेही इंटरनल लिथियम आर्यन बॅचरी आपल्या कॅपॅसिटीच्या १०० टक्क्यांपर्यंत पोहोचते बॅटरीचे चार्जिंग बंद होते. मात्र जर तुम्ही रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवाल तर मोबाईल फोन काही प्रमाणात एनर्जी कंझ्युम करेल. जेव्हा फोनची बॅटरी ९९ टक्क्यांवर येते तेव्हा मोबाईल पुन्हा चार्ज होऊ लागतो. यामुळे फोनच्या आयुष्यमानावर परिणाम होतो.



काय करणे योग्य?


याबाबत चिंता करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा फोनला चार्जिंगला लावा आणि चार्जिंग झाल्यानंतर काढून टाका अथवा रात्रीत जर तुमची झोप उघडली तर फोन चार्जिंगवरून काढा. यासाठी तुम्ही स्मार्ट प्लगचा वापर करू शकता ज्यामुळे काही वेळाने चार्जिंग बंद होऊन जाते.

Comments
Add Comment

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली