Mobile Number: ७० लाख मोबाईल नंबर बंद, सरकारने का उचलले हे पाऊल?

Share

नवी दिल्ली: देशात डिजीटल आणि ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दररोज सायबर गुन्हेगार फोन कॉल अथवा मेसेजिंगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत आहे. आर्थिक सेवा सचिव विवेक जोशी यांनी मंगळवारी सांगितले की सरकारने डिजीटल फसवणुकीवर बंदी घालण्याच्या दिशेने पाऊल उचलताना संशयित देवाण-घेवाणीमध्ये सामील ७० लाख मोबाईल नंबर(mobile number) निलंबित केले आहेत.

आर्थिक सायबर सुरक्षा आणि वाढत्या डिजीटल पेमेंटच्या फसवणुकीसंदर्भातील मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर ते म्हणाले बँकांना या संबंधित व्यवस्था तसेच प्रक्रिया अधिक मजबूत करण्यास सांगितले आहे. याबाबतच अशा अनेक बैठकी होतील आणि पुढील बैठक जानेवारीमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी एजन्सीमध्ये ताळमेळ गरजेचा

आर्थिक सेवा सचिवांनी याबाबत बोलाताना सांगितले की राज्यांना याबाबतच्या मुद्द्यांवर लक्ष घालण्यास सांगितले तसेच आकडा सुनिश्चित करण्यास सांगितला आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या केवायसी मानकीकरणाबाबतही चर्चा झाली. आर्थिक सेवा सचिव यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत सायबर फसवणूक रोखण्यासाठी विविध एजन्सीमध्ये चांगला समन्वय कसा साधला जाईल याबाबतही चर्चा करण्यात आली.

जोशी म्हणाले, भोळ्याभाबड्या लोकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी समाजात सायबर फसवणुकीबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. या बैठकीत राजस्व विभाग, दूरसंचार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिक मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता.

Tags: mobile

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

26 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

26 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

28 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

41 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

45 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago