Bank Employees : बँक कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार खुशखबर!

मुंबई: सरकारी बँक(government bank) कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. इंडियन बँक असोसिएशनने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ ते २० टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव चांगला आहे. यासोबतच ५ दिवस कामकाजाबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. फायनान्शियस एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार इंडियन बँक असोसिएशन आणि बँक युनियन यांच्यातील चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच या दोन्ही मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.



IBA ने सांगितली ही बाब


फायनान्शियल एक्सप्रेसबाबत बोलताना आयबीएने सांगितले की पहिल्यांदा पगारवाढीबाबत चर्चा १५ टक्क्यांपासून सुरू झाली आहे. अशातच बैठकीत १५ ते २० टक्के पगारवाढीचा लाभ मिळू शकतो जे गेल्या अनेक वर्षांत चांगले आहे. पब्लिक सेक्टर बँका तसेच आयबीए यांच्यातील सध्याचा पगार करार १ नोव्हेंबर २०२२ला संपला आहे. ायानंतर सातत्याने पगारवाढीबाबत बँक युनियन्स तसेच आयबीए यांच्यात चर्चा सुरू आहे. जर पाच दिवसांचे कामकाज आणि पगार वाढीबाबतच्या मुद्द्यावर तोडगा निगाला तर हा नियम क्षेत्रीय ग्रामीण बँक कर्मचाऱ्यांनाही लागू होईल.



आठवड्याचे ५ दिवस कामाबाबत दीर्घकाळापासून मागणी प्रलंबित


बँक युनियन दीर्घकाळापासून पाच दिवसांचे कामकाजाचे नियम लागू करण्याची मागणी करत आहे. दरम्यान, बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. जर ५ दिवस कामकाजाबाबतची मागणी मान्य झाली तर आठवड्यातील पाच दिवस बँकेच्या कामकाजाच्या वेळेत ३० ते ४५ मिनिटांनी वाढ होईल. डिसेंबरच्या मध्यावधीत याबाबतचा निर्णय शक्य आहे.



लोकसभा निवडणुकीआधी मिळणार बक्षीस


पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणूक होत आहे. अशातच अर्थ मंत्रालय देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढीसह आठवड्यातील दोन दिवसांच्या सुट्टींचे बक्षीस मिळू शकते. आयबीए आणि बँक युनियम यांच्यात करार झाल्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे दिला जाईल. अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर नवे नियम लागू केले जातील.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने