Solapur Crime : शिक्षक हैवान झाला; शिक्षिका पत्नीसह मुलाचा गळा घोटला!

  208

स्वतःही केली आत्महत्या; मात्र कारण गुलदस्त्यात


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना (Solapur Crime) घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नी व मुलाची हत्या (Murder) करुन नंतर आत्महत्या (Suicide) केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना घडली. अतुल मुंडे असे हत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून त्यांची पत्नीही शिक्षिकाच होती. हे टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले असावे याचा अद्याप उलगडा झालेला नाही.


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान आधी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया पोलिसांकडून समोर आलेली नाही.


याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये अतुल मुंडे (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह राहत होते. त्यांच्या पत्नी तृप्ती अतुल मुंडे (वय ३५)देखील शिक्षका होत्या. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मात्र, आज अचानक मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला.


याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, अतुल मुंडे यांनी आधी पत्नी तृप्ती यांची गळा कापून हत्या केली. तर मुलगा सुमंत याच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. त्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. हा संशय असून सर्वच बाजूंनी या घटनेचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे