Solapur Crime : शिक्षक हैवान झाला; शिक्षिका पत्नीसह मुलाचा गळा घोटला!

स्वतःही केली आत्महत्या; मात्र कारण गुलदस्त्यात


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना (Solapur Crime) घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नी व मुलाची हत्या (Murder) करुन नंतर आत्महत्या (Suicide) केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना घडली. अतुल मुंडे असे हत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून त्यांची पत्नीही शिक्षिकाच होती. हे टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले असावे याचा अद्याप उलगडा झालेला नाही.


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान आधी पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया पोलिसांकडून समोर आलेली नाही.


याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये अतुल मुंडे (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह राहत होते. त्यांच्या पत्नी तृप्ती अतुल मुंडे (वय ३५)देखील शिक्षका होत्या. अतुल मुंडे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मात्र, आज अचानक मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला.


याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, अतुल मुंडे यांनी आधी पत्नी तृप्ती यांची गळा कापून हत्या केली. तर मुलगा सुमंत याच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. त्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. हा संशय असून सर्वच बाजूंनी या घटनेचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे