IND vs AUS 3rd T20I: ऑस्ट्रेलियासाठी करो वा मरो सामना, टीम इंडियाचा विजयी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न

गुवाहाटी: भारत आणि ऑस्ट्रेलिया(india vs australia) यांच्यात आज २८ नोव्हेंबरला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. हा सामना निर्णायक असणार आहे कारण आजच्या सामन्यावरून भारत विजयी आघाडी घेणार की ऑस्ट्रेलियाचे आव्हान जिवंत राहणार हे स्पष्ट होणार आहे.


खरंतर, या मालिकेचे सुरूवातीचे दोन सलग सामने भारताने जिंकले आहेत. अशातच आजच्या सामन्यात जर टीम इंडियाने विजय मिळवला तर मालिका त्यांच्या नावे होईल. त्यामुळे या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी हा करो वा मरो सामना असणार आहे.


ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यात भारताला चांगली टक्कर दिली मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात ते हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करतील.



गुवाहाटीत आहे हा सामना


हा सामना गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या मैदानावर दोन सामने झाले आहेत. पहिल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ १२०चा आकडाही पार करू शकले नाही तर दुसऱ्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने २२५चा आकडा पार केला होता. अशातच या पिचचे आकलन करणे कठीण आहे. या मैदानावर आधीही भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. २०१७मध्ये झालेल्या येथील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८ विकेटनी मात दिली होती.



दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग ११


ऑस्ट्रेलिया - ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ, जोश इंगलिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, ग्लेन मैक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर आणि कर्णधार), जेसन बेहरेनडोर्फ/सीन एबॉट, नाथन एलिस, एडम जम्पा आणि तनवीर संघा.


भारत: यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए