Mumbai AQI : अवकाळी पाऊस मुंबईकरांसाठी ठरला देवदूत; हवेची गुणवत्ता सुधारली

जाणून घ्या तुमच्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक


मुंबई : गेल्या महिन्याभरात मुंबईतील हजारो बांधकामे, वाढलेली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामुळे वाढलेली वाहनांची संख्या, उद्योगांतून बाहेर पडणारे विषारी वायू यांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality) प्रचंड खालावली होती. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) ३०० च्या पार पोहोचला होता, जो अत्यंत खराब हवा दर्शवतो. त्यात भर पडली ती दिवाळीत (Diwali) मनसोक्त फोडलेल्या फटाक्यांची. वारंवार सूचना देऊनही मुंबईकरांनी हवे तसे फटाके फोडले. त्यामुळे हवेची गुणवत्ता पातळी आणखी खालावली. मात्र, नुकताच झालेला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) मुंबईकरांसाठी देवदूत ठरला आहे. पावसामुळे मुंबईतील हवा चांगलीच सुधारली आहे.


रविवारी मुंबई उपनगरासह राज्यातही विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली येण्यास मदत झाली आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI १००च्या खाली आहे. बीकेसीचा AQI १०३ वर आहे. आज देखील मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे.



जाणून घ्या तुमच्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक


एकूण मुंबई - ६० AQI
कुलाबा - ७६
भांडुप - ३७
मालाड - ३५
माझगाव - ४७
वरळी - ३३
बोरिवली - ६५
बीकेसी - १०३
चेंबूर - ८९
अंधेरी - ६७
नवी मुंबई - ५३



हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?


० ते ५० AQI - उत्तम
५० ते १०० AQI - समाधानकारक
१०१ ते २०० AQI - मध्यम
२०१ ते ३००० AQI - खराब
३०१ ते ४०० AQI - अतिशय खराब
४०१ ते ५०० AQI - गंभीर

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध