Mumbai AQI : अवकाळी पाऊस मुंबईकरांसाठी ठरला देवदूत; हवेची गुणवत्ता सुधारली

जाणून घ्या तुमच्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक


मुंबई : गेल्या महिन्याभरात मुंबईतील हजारो बांधकामे, वाढलेली प्रचंड लोकसंख्या आणि त्यामुळे वाढलेली वाहनांची संख्या, उद्योगांतून बाहेर पडणारे विषारी वायू यांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality) प्रचंड खालावली होती. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) ३०० च्या पार पोहोचला होता, जो अत्यंत खराब हवा दर्शवतो. त्यात भर पडली ती दिवाळीत (Diwali) मनसोक्त फोडलेल्या फटाक्यांची. वारंवार सूचना देऊनही मुंबईकरांनी हवे तसे फटाके फोडले. त्यामुळे हवेची गुणवत्ता पातळी आणखी खालावली. मात्र, नुकताच झालेला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) मुंबईकरांसाठी देवदूत ठरला आहे. पावसामुळे मुंबईतील हवा चांगलीच सुधारली आहे.


रविवारी मुंबई उपनगरासह राज्यातही विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली येण्यास मदत झाली आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI १००च्या खाली आहे. बीकेसीचा AQI १०३ वर आहे. आज देखील मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे.



जाणून घ्या तुमच्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक


एकूण मुंबई - ६० AQI
कुलाबा - ७६
भांडुप - ३७
मालाड - ३५
माझगाव - ४७
वरळी - ३३
बोरिवली - ६५
बीकेसी - १०३
चेंबूर - ८९
अंधेरी - ६७
नवी मुंबई - ५३



हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?


० ते ५० AQI - उत्तम
५० ते १०० AQI - समाधानकारक
१०१ ते २०० AQI - मध्यम
२०१ ते ३००० AQI - खराब
३०१ ते ४०० AQI - अतिशय खराब
४०१ ते ५०० AQI - गंभीर

Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता