गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग,पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरिकांची तारांबळ

पंचवटी (प्रतिनिधी)- गंगापूर धरणातून(gangapaur) जायकवाडी धरणासाठी सायंकाळीं पाच वाजेपर्यंत जवळपास ३१२२ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदाघाट परीसरासह पंचवटीत चांगलीच तारांबळ उडाली ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.


गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे गोदाघाट जलमय झाला होता. ऐन हिवाळ्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण व हवेत गारवा निर्माण झाला होता.


पंचवटी सह नाशिक शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊसाने चांगलीच हजेरी लावली. यांमुळे मुख्य बाजारपेठेत ग्राहक आणि विक्रेते यांची धावपळ पाहायला मिळाली. गोदा काठावरील विक्रेत्यांना विक्रीची दुकाने व वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यात आली.


पंचवटीतील, गोदाघाट, राम कुंड, भाजी बाजार, आडगाव नाका, मालेगांव स्टॅण्ड, येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. तसेच पंचवटीलगतच्या ग्रामीण भागातील मखमलाबाद, दरी, मातोरी, म्हसरुळ, आडगाव, नांदूर, मानूर या शिवारातील रब्बी हंगामाच्या पिकांसह द्राक्षाला या पावसाने फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.



नियोजनाचा फज्जा


अचानक झालेल्या पावसाने मनपाच्या रस्ते, खड्डे, पावसाळी गटार योजनेचा व नियोजनाचा पुन्हा एकदा फज्जा उडाला. रस्त्यावर व खड्ड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून आले. व सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या व नवीन रस्त्याच्या डांबरीकरणाचे तीन तेरा वाजले. यातून मनपाच्या अनियमित नियोजनाचे दर्शन नागरिकांना झाले.

Comments
Add Comment

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर सरकारचा भर

राज्यातील प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक विभागाने

Nida Khan : निदा खान TCS मधून निलंबित, अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २७ एप्रिलला

नाशिक : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला टीसीएसने सेवेतून निलंबित केले आहे. पोलीस निदाला शोधत आहे.

Kolhapur : कोल्हापूरमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणार

मुंबई : कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी आवश्यक मदत आणि निधी उपलब्ध करून

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज