गुजरातमध्ये वीज कोसळून २० जणांचा मृत्यू, अलर्ट जारी

अहमदाबाद : राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता देशाच्या इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. अशातच आता गुजरातमधून एक हृदयद्रावक घटना बातमी समोर आली. गुजरातमध्ये अवकाळी पावसादरम्यान, वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.


गुजरातमध्ये काल अवकाळी पावसाने जोरदार हेजरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मनुष्यहानी झाली, शिवाय जनावरांचाही मृत्यू झाला. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातच्या विविध भागात वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार मृत्यू झाले. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.


या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून शक्य त्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली आहे. शाह यांनी प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर

कर्नाटकापाठोपाठ आंध्रातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय