अहमदाबाद : राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता देशाच्या इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. अशातच आता गुजरातमधून एक हृदयद्रावक घटना बातमी समोर आली. गुजरातमध्ये अवकाळी पावसादरम्यान, वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
गुजरातमध्ये काल अवकाळी पावसाने जोरदार हेजरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मनुष्यहानी झाली, शिवाय जनावरांचाही मृत्यू झाला. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातच्या विविध भागात वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार मृत्यू झाले. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून शक्य त्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली आहे. शाह यांनी प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…