Nitesh Rane: ऋषिकेश बेदरे हा प्यादा, तर दगडफेकीमागचे सुत्रधार कोण?

विरोधी पक्षाने आणि मनोज जरांगें-पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची जाहीर माफी मागावी

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेत सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान दगडफेक करुन पोलीसांना लाठीचार्ज करण्यास भाग पाडणाऱ्या ऋषिकेश बेदरे-पाटील याला अटक करण्यात आली आहे. दगडफेक झाल्यानंतर दोनच दिवसांनी ऋषिकेश बेदरे ह्यांने शरद पवारांच्या भेटीला गेल्याचा फोटो पोस्ट केला होता. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज आपली भूमिका मांडली.


नितेश राणे म्हणाले, जालन्यामध्ये झालेल्या दगडफेकीचा मास्टरमाईंड ऋषिकेश बेदरे दगडफेकींनंतर लगेचंच शरद पवारांच्या भेटीला जातो. त्यामुळे महाराष्ट्राला नेमकं कोण अशांत करण्याचा प्रयत्न करतयं याची उत्तरे महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत. त्या दगडफेकींनंतर पोलीसांनी लाठीचार्ज का केला? कोणी आदेश दिले? यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरण्यात आले होते. आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आल्या त्याचबरोबर काड्या करण्याचे आरोप देखील करण्यात आले.



ऋषिकेश बेदरे-पाटील हा सामान्य कार्यकर्ता असुन त्याच्यामागे कोणी ताकद उभी केली? त्या दगडफेकीमागचे नेमके उद्दिष्ट काय? ही दगडफेक नेमकी कोणी करायला लावली? या सगळ्याची उत्तरे विरोधी पक्षाने आणि मनोज जरांगें-पाटलांनी द्यावी. आणि त्याच बरोबर सर्वांनी देवेंद्र फडणवीसांची जाहीर माफी मागावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

मुंबई - गुजरात महामार्गावर वाहतूक कोंडी ; गॅस टँकर उलटला

पालघर : मुंबई-गुजरात महामार्गावरून जात असताना गॅस टँकर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर खोल खड्ड्यात

Eknath Shinde : वरळीतील हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये दुर्दैवी मृत्यू! आयोजक चौकशीच्या फेऱ्यात, एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८

Ameet Satam : अंधेरीच्या क्रीडा संकुलातील ५६ खोल्यांचा बेकायदा गैरवापर

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे चौकशीचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेने अंधेरी

Tajinder Singh Tiwana : प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम” सुरू

मुंबई : पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध

Maharashtra : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मान्सून कोकणात पोहोचला तरी...

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत

CYBER CRIME : सावधान! व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने गंडा; नवी मुंबईतील व्यावसायिकाची १ कोटी ९ लाखांची फसवणूक

NAVI MUMBAI : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सध्या फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. नवी मुंबईत शेअर बाजारात