IND Vs AUS 2nd T20 : भारताचा धावांचा डोंगर, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडले

मुंबई: भारतीय संघ(team india) आपल्या घरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. हा सामना तिरूअनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करताना ४ बाद २३५ धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे.


भारताच्या पहिल्या तीन जणांनी अर्धशतके ठोकली. गेल्या सामन्यात भारताचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. मात्र या दोघांनी या सामन्यात दमदार अर्धशतके ठोकली. यशस्वी जयसवालने ५३ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ५८ धावा केल्या.


इशान किशनने या सामन्यात ५२ धावा तडकावल्या. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. सूर्याने १९ धावा केल्या. तर रिंकू सिंहने या सामन्यात नाबाद ३१ धावा केल्या. भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती धुलाई केली.


ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने तीन विकेट मिळवल्या. तर मार्कस स्टॉयनिसला एक विकेट मिळवण्यात यश मिळाले.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.

IND vs ENG T20 : पावसाचा खेळ! भारत-इंग्लंड पहिला टी-२० सामना रद्द

डरहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० (T20) सामना मुसळधार पावसामुळे रद्द (Cancelled) करण्यात आला. भारतीय संघाचा (Team