नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रदूषणाची (Pollution) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दिल्लीचा एक्यूआय (AQI) ५०० वर पोहोचला आहे. हवेची ही पातळी “गंभीर” श्रेणीत मोडते. एक दिवस आधी शुक्रवारी ते ४०० होते.
यंदाचा नोव्हेंबर महिना २०१५ नंतर नऊ वर्षांतील सर्वात प्रदूषित (Pollution) महिना ठरला आहे. या महिन्याच्या २४ दिवसांपैकी असा एकही दिवस गेलेला नाही जेव्हा दिल्लीचा एक्यूआय २०० च्या खाली गेला असेल. या महिन्यात दिल्लीतील लोकांना सतत ‘खराब’, ‘खूप वाईट’, ‘गंभीर किंवा ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीतील हवा श्वास घ्यावी लागत आहे.
दिल्लीतील वीस क्षेत्रे आहेत जिथे एक्यूआय “अत्यंत गंभीर” श्रेणीत पोहोचला आहे. येथील एक्यूआय ४०० च्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, काही भागात एक्यूआय ४७० च्या पुढे गेला आहे. हे सर्व क्षेत्र आधीच प्रदूषणाचे हॉट स्पॉट म्हणून ओळखले जातात.
सध्या दिल्लीत वाऱ्याचा वेग खूपच कमी झाला आहे. विशेषत: सकाळच्या वेळी वारा अतिशय शांतपणे वाहत असतो. दिवसा वारा वाहत असतानाही त्याचा वेग ताशी चार किलोमीटर इतकाच राहतो. त्यामुळे प्रदूषक कणांचा प्रसार अत्यंत संथ होत चालला आहे. आकाशातही धुक्याचा थर पसरला आहे. लोकांना सामान्यपेक्षा जास्त प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…