Pollution : दिल्लीत प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक!

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रदूषणाची (Pollution) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दिल्लीचा एक्यूआय (AQI) ५०० वर पोहोचला आहे. हवेची ही पातळी "गंभीर" श्रेणीत मोडते. एक दिवस आधी शुक्रवारी ते ४०० होते.


यंदाचा नोव्हेंबर महिना २०१५ नंतर नऊ वर्षांतील सर्वात प्रदूषित (Pollution) महिना ठरला आहे. या महिन्याच्या २४ दिवसांपैकी असा एकही दिवस गेलेला नाही जेव्हा दिल्लीचा एक्यूआय २०० च्या खाली गेला असेल. या महिन्यात दिल्लीतील लोकांना सतत 'खराब', 'खूप वाईट', 'गंभीर किंवा 'अत्यंत गंभीर' श्रेणीतील हवा श्वास घ्यावी लागत आहे.


दिल्लीतील वीस क्षेत्रे आहेत जिथे एक्यूआय "अत्यंत गंभीर" श्रेणीत पोहोचला आहे. येथील एक्यूआय ४०० च्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, काही भागात एक्यूआय ४७० च्या पुढे गेला आहे. हे सर्व क्षेत्र आधीच प्रदूषणाचे हॉट स्पॉट म्हणून ओळखले जातात.


सध्या दिल्लीत वाऱ्याचा वेग खूपच कमी झाला आहे. विशेषत: सकाळच्या वेळी वारा अतिशय शांतपणे वाहत असतो. दिवसा वारा वाहत असतानाही त्याचा वेग ताशी चार किलोमीटर इतकाच राहतो. त्यामुळे प्रदूषक कणांचा प्रसार अत्यंत संथ होत चालला आहे. आकाशातही धुक्याचा थर पसरला आहे. लोकांना सामान्यपेक्षा जास्त प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.



प्रदूषणाचे हॉट स्पॉट



  • आनंद विहार- 460

  • अलीपूर- 446

  • बवना- 468

  • बुरारी-427

  • करणी सिंग शूटिंग-416

  • द्वारका 437

  • विमानतळ-423

  • जहांगीरपुरी-469

  • जवाहरलाल नेहरू स्टेडियम-402

  • मेजर ध्यानचंद स्टेडियम-420

  • टेंपल रोड 417

  • वजीरपूर-464

  • विवेक विहार-471

  • सोनिया विहार-449

  • शादीपूर-401

  • नरेला-431

  • पटपरगंज-462

  • पंजाबी बाग-463

  • आरके पुरम-430

  • नजफगड-404

Comments
Add Comment

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर