मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत २५ आणि २६ नोव्हेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात पुढील ४८ तासांत मुंबई, ठाणेसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.


आठवड्याच्या शेवटी मुंबईत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.


बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशाच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. कधी ऊन, कधी पाऊस असं चित्र पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिना जवळजवळ संपत आला असला, तरी थंडी मात्र वाढलेली नाही. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या आकडेवारीनुसार, पूर्वेकडील चक्रीवादळ पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पडत आहे. तो लवकरच केरळ आणि आसपासच्या भागात पोहोचेल. त्यानंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचा : उत्तर मुंबईत भाजपाचे मिशन ३२

मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मुंबई हा भाजपाचा गड मानला जात असला तरी मागील आगामी महापालिका निवडणुकीच्या

राष्ट्रीय महामार्गावर ‘राजमार्गयात्रा’अॅप सोयीस्कर

मुंबई  : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासादरम्यान पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र किंवा हॉस्पिटल कुठे

सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी बृहद् आराखडा

तीन जिल्ह्यांच्या ऐतिहासिक प्रसिद्धीसाठी ‘डीएमओ’ निर्माण करणार मुंबई : राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन

सोलापुरातील चार माजी आमदारांचा भाजपप्रवेश; फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्त खलबतं

सोलापुर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'डिजीटल अरेस्ट' दाखवून उद्योजकाकडून ५८ कोटी रुपये लुटले

मुंबई : मुंबईत उद्योजकाला 'डिजीटल अरेस्ट' दाखवून ५८ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रकरणी

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा

उद्योगांनी गरजा समजून योगदान द्यावे राज्य शासन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध योजना आणि उपक्रम राबवित आहे.