कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आदी परिसराला पाणीपुरवठा करणा-या महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली क्षेत्रात मंगळवारी पाणी येणार नाही.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे जलशुध्दीकरण केंद्र, नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र व मोहिली जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरिता मंगळवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या बारावे, नेतिवली, व मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण (पूर्व व पश्चिम), डोंबिवली (पूर्व व पश्चिम), व कल्याण ग्रामिण विभाग (टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी सह ग्रामिण विभागातील इतर गावे) या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तरी या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी केले आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…