BJP Vs Congress : भारत हरत असताना उठून निघून गेल्या होत्या इंदिरा गांधी... मग त्यांना काय म्हणावं? 

पंतप्रधानांना पनवती म्हणणार्‍या राहुल गांधींना भाजपचा पुराव्यासकट खोचक सवाल 



मुंबई : क्रिकेट विश्वचषकाचा (Cricket World Cup 2023) यावर्षीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India Vs Australia final match) १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने करोडो भारतीयांचे स्वप्न तुटले. यानंतर स्टेडिअममध्ये उपस्थित असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले. ही गोष्ट मात्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना (Rahul Gandhi) रुचली नसल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांचा पनवती असा उल्लेख केला. त्यांच्या उपस्थितीमुळेच आपण हरलो, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही तितकेच चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यासंदर्भात एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका मुलाखतीत पाकिस्तानच्या (Pakistan) हॉकी संघातील खेळाडू भारत हरत असताना पंतप्रधान इंदिरा गांधी उठून निघून गेल्या होत्या हा प्रसंग सांगतो. १९८२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अंतिम सामन्याच्या वेळचा हा प्रसंग आहे.


पाकिस्तानी खेळाडू म्हणतो, “आम्ही भारतात आशियाई क्रीडा स्पर्धा खेळलो. तो आमच्यासाठी संस्मरणीय क्षण होता. दिल्लीत १९८२ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही भारताविरुद्ध अंतिम सामना खेळलो. त्या सामन्याला त्यांच्या पंतप्रधान इंदिरा गांधीही उपस्थित होत्या. त्या असताना आम्ही हा सामना ७-१ ने जिंकला. पाच गोल झाल्यानंतर इंदिरा गांधी निघून गेल्या. भारतात भारताला हरवणं हा आमच्यासाठी मोठा क्षण होता”, असं त्याने मुलाखतीत सांगितलं आहे.







अमित मालवीय यांनी या व्हिडीओसोबत एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “ते वर्ष होतं १९८२. नवी दिल्लीमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीचा अंतिम सामना खेळत होता. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. तो सामना भारतानं पाकिस्तानविरुद्ध १-७ असा गमावला. पाकिस्ताननं ५ गोल केल्यानंतर इंदिरा गांधी मैदानातून निघून गेल्या. मग राहुल गांधींच्या मते इंदिरा गांधींना काय म्हणायला हवं?” असा खोचक सवाल उपस्थित करत अमित मालवीय यांनी राहुल गांधींना चपराक लगावली आहे.

Comments
Add Comment

Rental Boyfriend Trend : भारतात 'Rent Boyfriend' ट्रेंडची एंट्री! तासाच्या हिशोबाने मिळतो बॉयफ्रेंड, काय आहे हा प्रकार?

मुंबई : ऑनलाईन (Online) कॅब बुक (Cab Book) करणे किंवा पर्सनल ट्रेनर (Personal Trainer) शोधणे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र, आता भारतात 'Rent

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद