BJP Vs Congress : भारत हरत असताना उठून निघून गेल्या होत्या इंदिरा गांधी... मग त्यांना काय म्हणावं? 

पंतप्रधानांना पनवती म्हणणार्‍या राहुल गांधींना भाजपचा पुराव्यासकट खोचक सवाल 



मुंबई : क्रिकेट विश्वचषकाचा (Cricket World Cup 2023) यावर्षीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India Vs Australia final match) १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने करोडो भारतीयांचे स्वप्न तुटले. यानंतर स्टेडिअममध्ये उपस्थित असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले. ही गोष्ट मात्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना (Rahul Gandhi) रुचली नसल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांचा पनवती असा उल्लेख केला. त्यांच्या उपस्थितीमुळेच आपण हरलो, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही तितकेच चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यासंदर्भात एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका मुलाखतीत पाकिस्तानच्या (Pakistan) हॉकी संघातील खेळाडू भारत हरत असताना पंतप्रधान इंदिरा गांधी उठून निघून गेल्या होत्या हा प्रसंग सांगतो. १९८२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अंतिम सामन्याच्या वेळचा हा प्रसंग आहे.


पाकिस्तानी खेळाडू म्हणतो, “आम्ही भारतात आशियाई क्रीडा स्पर्धा खेळलो. तो आमच्यासाठी संस्मरणीय क्षण होता. दिल्लीत १९८२ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही भारताविरुद्ध अंतिम सामना खेळलो. त्या सामन्याला त्यांच्या पंतप्रधान इंदिरा गांधीही उपस्थित होत्या. त्या असताना आम्ही हा सामना ७-१ ने जिंकला. पाच गोल झाल्यानंतर इंदिरा गांधी निघून गेल्या. भारतात भारताला हरवणं हा आमच्यासाठी मोठा क्षण होता”, असं त्याने मुलाखतीत सांगितलं आहे.







अमित मालवीय यांनी या व्हिडीओसोबत एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “ते वर्ष होतं १९८२. नवी दिल्लीमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीचा अंतिम सामना खेळत होता. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. तो सामना भारतानं पाकिस्तानविरुद्ध १-७ असा गमावला. पाकिस्ताननं ५ गोल केल्यानंतर इंदिरा गांधी मैदानातून निघून गेल्या. मग राहुल गांधींच्या मते इंदिरा गांधींना काय म्हणायला हवं?” असा खोचक सवाल उपस्थित करत अमित मालवीय यांनी राहुल गांधींना चपराक लगावली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींची व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज म्हणजेच गुरुवार ४ जून रोजी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे

TMC political crisis 20 MP likely to join BJP : ममता बॅनर्जींना मोठा झटका! ६० आमदारांनंतर आता २० खासदार भाजपाच्या वाटेवर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतील दारुण

Jodhpur female influencer: ट्रोलिंगचा त्रास असह्य झाला; जोधपूरमधील महिला इन्फ्लुएन्सरने उचलले टोकाचे पाऊल

जोधपूर : जोधपूरमध्ये सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून एका महिला कंटेंट क्रिएटरने (Content Creator) आत्महत्येचा प्रयत्न

Crime News : डॉक्टर की शैतान ! आधी 8000 रुपयात हाड जोडली, नंतर उरलेले पैसे न दिल्याने डॉक्टरने केले असे काही की ऐकून तुम्हालांही धक्का बसेल

Uttar Pradesh Crime News : मृत्यूच्या खाईतून रुग्णाला परत आणणाऱ्या डॉक्टरला देवाचं दुसरं रूप समजलं जातं. पण हाच डॉक्टर बऱ्याचदा

Indian Railways News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC च्या ८०० हून अधिक बेस किचनवर AI कॅमेऱ्यांचा २४ तास पहारा

नवी दिल्ली (IRCTC AI Cameras) : रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासी गाड्यांमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत वारंवार

MONSOON : मान्सूनचे केरळमध्ये दमदार आगमन; दक्षिण भारतासह देशातील २४ राज्यांना पावसाचा इशारा

NEW DELHI : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मान्सूनने केरळमध्ये अधिकृतपणे धडक दिली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)