काठमांडू: नेपाळच्या(nepal) मकवानपूर जिल्ह्यातील चितलांगमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके(earthquake) जाणवले. नेपाळ भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचे झटके गुरूवारी सकाळी सकाळी जाणवले. दरम्यान, यामुळे आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही. नेपाळमध्ये याच महिन्याच्या सुरूवातीला ३ नोव्हेंबरला ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धकके बसले होते. यातून नेपाळ सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
नेपाळमध्ये जाणवलेल्या ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी तसेच वित्तहानी झाली होती. या भूकंपात तब्बल १५७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर हजारोंच्या संख्येने जखमीही झाले होते.
नेपाळमध्ये नुकतेच भूकंपाचे जोरदार झटके जाणवले होते. यामुळे तेथील प्रचंड मोठे नुकसान झाले. गेल्या ३ नोव्हेंबरला नेपाळच्या जाजरकोटमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या झटक्यामध्ये ८ हजाराहून अधिक घरे कोसळली होती. त्या दरम्यान भारताने भूकंपप्रभावित लोकांसाठी आपातकालीन मदत पाठवली होती. यात मेडिकल उपकरणे, महत्त्वाचे सामान आणि बरंच काही सामील होते.
नेपाळच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात भयानक भूकंपाचे झटके २०१५मध्ये जाणवले होते. या दरम्यान ८ हजाराहून अधिक जणांचां मृत्यू झाला होता. तेव्हा भूकंपाची तीव्रता ७.८ आणि ८.१ इतकी होती. हे भूकंपाचे झटके २५ एप्रिल २०१५ला सकाळी स्थानिक वेळेनुसार ११ वाजून ५६ मिनिटांनी जाणवले.यावेळेस अनेक ऐतिहासिक मंदिरे तसेच इमारती पूर्णपणे कोसळल्या होत्या.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…