Health Tips: थंडीत गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड? घ्या जाणून

Share

मुंबई: उत्तर भारतात थंडीचा(cold) मौसम सुरू झाला आहे. सातत्याने तापमानात घसरण होत आहे. पुढील २-३ आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. अशातच लोक निरोगी(healthy) राहण्यासाठी काळजी घेत असतात. थंडीत लोक गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याला पसंती देतात. दरम्यान, अनेकजण कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात.

दरम्यान, आपल्या आरोग्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले असते की थंड पाण्याने हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, आयुर्वेदात थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले असते. आंघोळीसाठी पाणी जास्त गरम असता कामा नये.

थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो. शरीरही मोकळे होण्यास मदत होते. या पाण्याने शरीराची चांगली स्वच्छता होते. तसेच सर्दीपासून आराम मिळतो. दरम्यान, त्वचेशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी गरम पाण्याने आंघोळ करू नये.

दरम्यान, थंड पाण्याने आंघोळ करण्याने काही नुकसान होत नाही. कोणत्याही मोसमात थंड पाण्याने आंघोळ केली जाऊ शकते. दरम्यान, रात्रभर भरून ठेवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. दरम्यान ताज्या पाण्याने आंघोळ केल्यास इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते.

ज्या लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास आहे तसेच ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे त्यांनी ताज्या पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

5 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

6 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

6 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

7 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

8 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

8 hours ago