Health Tips: थंडीत गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड? घ्या जाणून

मुंबई: उत्तर भारतात थंडीचा(cold) मौसम सुरू झाला आहे. सातत्याने तापमानात घसरण होत आहे. पुढील २-३ आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. अशातच लोक निरोगी(healthy) राहण्यासाठी काळजी घेत असतात. थंडीत लोक गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याला पसंती देतात. दरम्यान, अनेकजण कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात.


दरम्यान, आपल्या आरोग्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले असते की थंड पाण्याने हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, आयुर्वेदात थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले असते. आंघोळीसाठी पाणी जास्त गरम असता कामा नये.


थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो. शरीरही मोकळे होण्यास मदत होते. या पाण्याने शरीराची चांगली स्वच्छता होते. तसेच सर्दीपासून आराम मिळतो. दरम्यान, त्वचेशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी गरम पाण्याने आंघोळ करू नये.


दरम्यान, थंड पाण्याने आंघोळ करण्याने काही नुकसान होत नाही. कोणत्याही मोसमात थंड पाण्याने आंघोळ केली जाऊ शकते. दरम्यान, रात्रभर भरून ठेवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. दरम्यान ताज्या पाण्याने आंघोळ केल्यास इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते.


ज्या लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास आहे तसेच ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे त्यांनी ताज्या पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

Comments
Add Comment

Bombay High Court : ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याकडे एकटक बघणं गुन्हा पण... मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे निरखून पाहणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि अत्यंत

Mumbai Local : आता लोकलमध्ये लटकून प्रवास करता येणार नाही , लवकरच...

मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून

Megablock Update : मुंबईकरांना रविवारी पुन्हा मेगाब्लॉकचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांना रविवारी पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेकडून विविध

Ashok Kharat Case, Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका?

 भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी तक्रार; बीडमधील व्यक्तीचा 'एसआयटी'कडे खळबळजनक दावा मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक

Bmc News, Vashi Gateway : वाशी प्रवेशद्वाराला मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव प्रतिष्ठानने केली महापौरांकडे मागणी

मुंबई : मुंबईच्या महापौरांच्या संकल्पनेतून मुंबईतील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि घड्याळ बसण्याचे काम हाती

Bmc News : वांद्र्यातील नवपाडा, घासबाजारमधील तुंबणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा

दक्ष सहायक आयुक्तांमुळे रेल्वेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात