Health Tips: थंडीत गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड? घ्या जाणून

मुंबई: उत्तर भारतात थंडीचा(cold) मौसम सुरू झाला आहे. सातत्याने तापमानात घसरण होत आहे. पुढील २-३ आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. अशातच लोक निरोगी(healthy) राहण्यासाठी काळजी घेत असतात. थंडीत लोक गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याला पसंती देतात. दरम्यान, अनेकजण कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात.


दरम्यान, आपल्या आरोग्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले असते की थंड पाण्याने हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, आयुर्वेदात थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले असते. आंघोळीसाठी पाणी जास्त गरम असता कामा नये.


थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो. शरीरही मोकळे होण्यास मदत होते. या पाण्याने शरीराची चांगली स्वच्छता होते. तसेच सर्दीपासून आराम मिळतो. दरम्यान, त्वचेशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी गरम पाण्याने आंघोळ करू नये.


दरम्यान, थंड पाण्याने आंघोळ करण्याने काही नुकसान होत नाही. कोणत्याही मोसमात थंड पाण्याने आंघोळ केली जाऊ शकते. दरम्यान, रात्रभर भरून ठेवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. दरम्यान ताज्या पाण्याने आंघोळ केल्यास इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते.


ज्या लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास आहे तसेच ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे त्यांनी ताज्या पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

Comments
Add Comment

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस