World Cup 2023: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, पराभवानंतरही टीम इंडियाला मिळाले कोट्यावधी रूपये

  107

मुंबई: ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार पैशांचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप २०२३च्या फआयनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला हरवत खिताब आपल्या नावे केला. हा ऑस्ट्रेलियाचा सहावा वर्ल्डकप आहे.


या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार पैशांचा पाऊस पडला. केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर टीम इंडियाच्या खेळाडूंनाही कोट्यावधी रूपयांचे बक्षीस मिळाले. आयसीसीकडून वर्ल्डकप २०२३साठी एकूण १० मिलियन अमेरिकन डॉलर(८३ कोटी भारतीय रूपये) ची घोषणा करण्यात आली होती. जिंकणाऱ्या संघाला म्हणजेच ऑस्ट्रेलियाला ४ मिलियन अमेरिकन डॉलरची रक्कम देण्यात आली.

तर हरणाऱ्या संघाला टीम इंडियालाही बक्षीस मिळाले आहे. आयसीसीकडून रनरअप टीमला २ मिलियन अमेरिकन डॉलरचे बक्षीस देण्यात आले.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीमुळे २४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४३ षटकांत पूर्ण केले होते.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल