Amitabh Bachchan WC finale : बिग बींनी एकीकडे टीम इंडियाला दिले प्रोत्साहन; तर दुसरीकडे झाले ट्रोल

सेमीफायनल नंतरचं ते ट्विट नेटकर्‍यांच्या लक्षात...


मुंबई : काल क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) भारताच्या पराभवानंतर भारतीय संघाला (Team India) अवघ्या भारताकडून पाठिंबा मिळत आहे. पुढच्या सामन्यांमध्ये दमदार खेळी करत राहा अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे क्रिकेटप्रेम तर सर्वश्रुत आहे. त्यांनीही टीम इंडियाला ट्विट करत पाठिंबा दिला आहे. मात्र, न्यूझीलंडसोबत झालेल्या भारताच्या सेमीफायनल सामन्यानंतर केलेल्या एका मजेशीर ट्विटमुळे बिग बींना ट्रोलही केलं जात आहे.


कालच्या सामन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या एक्स अकाऊटवरुन एक ट्विट केलं. यात टीम इंडियाला उद्देशून ते म्हणाले, "काल रात्रीच्या सामन्याचा निकाल हा तुमच्या टॅलेंटचं, क्षमतेचं आणि स्थिरतेचं प्रतिबिंब नव्हतं. पण मला तुमचा अभिमान आहे. भविष्यात टीमसाठी चांगल्या गोष्टी घडतील, असंच चांगलं खेळत राहा." असं म्हणत अमिताभ यांनी टीम इंडियाला प्रोत्साहित केलं आहे.





तर दुसरीकडे काही नेटकरी अमिताभ बच्चन यांनी सेमीफायनल सामन्यानंतर केलेल्या ट्विटमुळे त्यांना ट्रोल करत आहेत. 'मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हा आपण जिंकतो', असं मजेशीर ट्विट बच्चन यांनी केलं होतं. मात्र, काल पराभवाची चाहूल लागल्यापासूनच 'बच्चन सामना पाहायला बसलेत का?', अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत आहेत. फायनलचा सामना तुम्ही पाहिला नाहीत ना? असा सवाल काहींनी केला. त्यामुळे विश्वचषकाइतकीच बच्चन यांनी सामना पाहिला की नाही याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह