अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान हसतहसत स्विकारलेल्या भारताने नंतर मात्र संथ कामगिरी केली.
आतापर्यंत भारताने विश्वचषकातील दहाही सामने जिंकल्याने भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. मात्र, फलंदाजी पाहता आता गोलंदाज तरी आपली जादू दाखवतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांतील हे सर्वात कमी धावसंख्या असलेलं आव्हान आहे.
सुरुवातीलाच शुभमन गिल अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्माही ४७ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर श्रेयसही चार धावांवर बाद झाला. विराट कोहलीने किमान अर्धशतक करत नाव राखले. तो ५४ धावांवर बाद झाला. केएल राहुलनेही ८५ चेंडूंमध्ये कसंबसं अर्धशतक पूर्ण केलं आणि ६६ धावांवर बाद झाला. सेमीफायनल गाजवलेला मोहम्मद शामी केवळ ६ धावांमध्ये आऊट झाला. तर जसप्रीत बुमराह अवघी एक धाव काढून आणि सूर्याकुमार यादव १८ धावांवर बाद झाला. त्यामुळे स्टोडिअममध्ये भारताचा जल्लोष दिसला नाही.
एका विकेटचा धक्का पचवत असतानाच दुसरी विकेट पडली, असं चित्र स्टेडिअमवर निर्माण झालं होतं. त्यामुळे वेळात वेळ काढून सामना पाहायला बसलेल्या चाहत्यांची निराशा झाली आहे. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी जर आपली जादू दाखवली तरच भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा ठेवता येऊ शकतात.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…