World Cup finale 2023 : भारताचं ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं तुटपुंजं आव्हान

आता जबाबदारी भारताच्या गोलंदाजांवर...


अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान हसतहसत स्विकारलेल्या भारताने नंतर मात्र संथ कामगिरी केली.


आतापर्यंत भारताने विश्वचषकातील दहाही सामने जिंकल्याने भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. मात्र, फलंदाजी पाहता आता गोलंदाज तरी आपली जादू दाखवतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांतील हे सर्वात कमी धावसंख्या असलेलं आव्हान आहे.


सुरुवातीलाच शुभमन गिल अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्माही ४७ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर श्रेयसही चार धावांवर बाद झाला. विराट कोहलीने किमान अर्धशतक करत नाव राखले. तो ५४ धावांवर बाद झाला. केएल राहुलनेही ८५ चेंडूंमध्ये कसंबसं अर्धशतक पूर्ण केलं आणि ६६ धावांवर बाद झाला. सेमीफायनल गाजवलेला मोहम्मद शामी केवळ ६ धावांमध्ये आऊट झाला. तर जसप्रीत बुमराह अवघी एक धाव काढून आणि सूर्याकुमार यादव १८ धावांवर बाद झाला. त्यामुळे स्टोडिअममध्ये भारताचा जल्लोष दिसला नाही.


एका विकेटचा धक्का पचवत असतानाच दुसरी विकेट पडली, असं चित्र स्टेडिअमवर निर्माण झालं होतं. त्यामुळे वेळात वेळ काढून सामना पाहायला बसलेल्या चाहत्यांची निराशा झाली आहे. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी जर आपली जादू दाखवली तरच भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा ठेवता येऊ शकतात.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे