World Cup finale 2023 : भारताचं ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं तुटपुंजं आव्हान

आता जबाबदारी भारताच्या गोलंदाजांवर...


अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान हसतहसत स्विकारलेल्या भारताने नंतर मात्र संथ कामगिरी केली.


आतापर्यंत भारताने विश्वचषकातील दहाही सामने जिंकल्याने भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. मात्र, फलंदाजी पाहता आता गोलंदाज तरी आपली जादू दाखवतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांतील हे सर्वात कमी धावसंख्या असलेलं आव्हान आहे.


सुरुवातीलाच शुभमन गिल अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्माही ४७ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर श्रेयसही चार धावांवर बाद झाला. विराट कोहलीने किमान अर्धशतक करत नाव राखले. तो ५४ धावांवर बाद झाला. केएल राहुलनेही ८५ चेंडूंमध्ये कसंबसं अर्धशतक पूर्ण केलं आणि ६६ धावांवर बाद झाला. सेमीफायनल गाजवलेला मोहम्मद शामी केवळ ६ धावांमध्ये आऊट झाला. तर जसप्रीत बुमराह अवघी एक धाव काढून आणि सूर्याकुमार यादव १८ धावांवर बाद झाला. त्यामुळे स्टोडिअममध्ये भारताचा जल्लोष दिसला नाही.


एका विकेटचा धक्का पचवत असतानाच दुसरी विकेट पडली, असं चित्र स्टेडिअमवर निर्माण झालं होतं. त्यामुळे वेळात वेळ काढून सामना पाहायला बसलेल्या चाहत्यांची निराशा झाली आहे. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी जर आपली जादू दाखवली तरच भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा ठेवता येऊ शकतात.

Comments
Add Comment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक

गॅस सिलिंडरच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ

नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक

मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी