Delhi: अरविंद केजरीवाल देणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा? आप प्रमुखांनी दिले मोठे विधान

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालयांनी शुक्रवारी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दरम्यान केजरीवाल यांनी सांगितले की आपली संघटना आणि कार्यकर्ते ही आम आदमी पक्षाची मोठी ताकद आहे. या निमित्ताने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधता सांगितले की जेलमध्ये पाठवण्याचा प्लान बनवला आहे.


केजरीवाल म्हणाले, आम्ही लोक तुरुंगात जाण्याला घाबरत नाही. मी एकदा १५ दिवस जेलमध्ये राहिलो आहे. आत ठीक व्यवस्था असते. यासाठी जेलमध्ये जाण्यापासून आप घाबरत नाही. जर भगत सिंह इतके दिवस जेलमध्ये राहू शकतात. मनीष सिसोदिया ९ महिने जेलमध्ये राहू शकतात. सत्येंद्र जैन एक वर्षे जेलमध्ये राहू शकतात तर आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही.



आम्हाला सत्तेची लालसा नाही - मुख्यमंत्री केजरीवाल


केजरीवाल पुढे म्हणाले, आम्हाला सत्तेची लालसा नाही. ४९ दिवसांनी राजीनामा दिला होता. आपल्या चौकीदाराच्या नोकरीचा राजीनामा देत नाही. माझ्या मते मी जगातील पहिला मुख्यमंत्री आहे ज्याने आपल्या मर्जीने ४९ दिवसांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्याला खुर्चीची लालसा नाही. मला राजीनामा दिला पाहिजे की जेलमधून सरकार चालवले पाहिजे याबाबत विविध लोकांशी मी चर्चा करत आहे.



जनतेच्या मर्जीशिवाय आम्ही काही करणार नाही


मुख्यमंत्री आपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले. दिल्लीच्या जनतेने आम्हाला खूप प्रेम दिले. दिल्लीच्या जनतेच्या मर्जीशिवाय आम्ही काही करणार नाही.

Comments
Add Comment

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर