IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याला सतर्क राहावे लागेल, फायनलआधी युवराज सिंहचे विधान

मुंबई: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चा फायनल सामना १९ डिसेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या महामुकाबलासामन्याआधी २०११च्या विश्वचषक चॅम्पियन युवराज सिंहने सांगितले की २०११प्रमाणेच यावेळेसही टीम इंडिया सामना जिंकेल. भारताला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल ती म्हणजे सुरूवातीचे तीन विकेट लवकर पडू नयेत. सोबतच त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाचे कौतुक केले.


युवराज म्हणाला, यावेळेस इंडिया खूपच छान खेळत आहे. मात्र ऑस्ट्रेलिया सुरूवातीला चांगली खेळली नाही मात्र ते फायनलला पोहोचले. यावेळेस ऑस्ट्रेलियाला जिंकणे कठीण वाटते. टीम इंडिया जसा परफॉर्मन्स देत आहे ते पाहता कोणतीही गडबड होणार नाही असे दिसते.


टीम इंडियाला हे लक्षात ठेवावे लागेल की आपल्यासमोर ऑस्ट्रेलिया आहे जे फायनलचा प्रेशर चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात त्यांनी अनेक फायनलचे सामने जिंकले आहेत.


युवराज पुढे म्हणाला, इंडियाचा परफॉर्मन्स वर्ल्डकपमध्ये असा सुरू आहे की सर्व संघ घाबरलेले आहेत. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली तर स्कोर ३५० ते ४०० पर्यंत पोहोचत आहे. जर आपली सलामीची जोडी चांगली कामगिरी करत असेल तर आपण खेळात चांगली आघाडी घेऊ शकतो. जर सुरूवातीचे तीन फलंदाज लवकरच बाद झाले तर आपल्यावर दबाव येऊ शकतो. हे अनेकदा आमच्यासोबत झाले आहे. जर असे नाही झाले तर भारताला हरवणे कठीण आहे.


रोहित शर्माची बॅटिंग कमालीची आहे. ते जर ४० बॉल खेळतील तर आरामात ७०-८० धावा करतील. जर ते १०० बॉल खेळले तर सहज २०० धावा करतील. ते टीम प्लेयर आहेत. त्यांच्यासाठी संघ आधी आहे.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए