IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याला सतर्क राहावे लागेल, फायनलआधी युवराज सिंहचे विधान

  121

मुंबई: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चा फायनल सामना १९ डिसेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या महामुकाबलासामन्याआधी २०११च्या विश्वचषक चॅम्पियन युवराज सिंहने सांगितले की २०११प्रमाणेच यावेळेसही टीम इंडिया सामना जिंकेल. भारताला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल ती म्हणजे सुरूवातीचे तीन विकेट लवकर पडू नयेत. सोबतच त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाचे कौतुक केले.


युवराज म्हणाला, यावेळेस इंडिया खूपच छान खेळत आहे. मात्र ऑस्ट्रेलिया सुरूवातीला चांगली खेळली नाही मात्र ते फायनलला पोहोचले. यावेळेस ऑस्ट्रेलियाला जिंकणे कठीण वाटते. टीम इंडिया जसा परफॉर्मन्स देत आहे ते पाहता कोणतीही गडबड होणार नाही असे दिसते.


टीम इंडियाला हे लक्षात ठेवावे लागेल की आपल्यासमोर ऑस्ट्रेलिया आहे जे फायनलचा प्रेशर चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात त्यांनी अनेक फायनलचे सामने जिंकले आहेत.


युवराज पुढे म्हणाला, इंडियाचा परफॉर्मन्स वर्ल्डकपमध्ये असा सुरू आहे की सर्व संघ घाबरलेले आहेत. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली तर स्कोर ३५० ते ४०० पर्यंत पोहोचत आहे. जर आपली सलामीची जोडी चांगली कामगिरी करत असेल तर आपण खेळात चांगली आघाडी घेऊ शकतो. जर सुरूवातीचे तीन फलंदाज लवकरच बाद झाले तर आपल्यावर दबाव येऊ शकतो. हे अनेकदा आमच्यासोबत झाले आहे. जर असे नाही झाले तर भारताला हरवणे कठीण आहे.


रोहित शर्माची बॅटिंग कमालीची आहे. ते जर ४० बॉल खेळतील तर आरामात ७०-८० धावा करतील. जर ते १०० बॉल खेळले तर सहज २०० धावा करतील. ते टीम प्लेयर आहेत. त्यांच्यासाठी संघ आधी आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल