IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याला सतर्क राहावे लागेल, फायनलआधी युवराज सिंहचे विधान

मुंबई: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चा फायनल सामना १९ डिसेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या महामुकाबलासामन्याआधी २०११च्या विश्वचषक चॅम्पियन युवराज सिंहने सांगितले की २०११प्रमाणेच यावेळेसही टीम इंडिया सामना जिंकेल. भारताला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल ती म्हणजे सुरूवातीचे तीन विकेट लवकर पडू नयेत. सोबतच त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाचे कौतुक केले.


युवराज म्हणाला, यावेळेस इंडिया खूपच छान खेळत आहे. मात्र ऑस्ट्रेलिया सुरूवातीला चांगली खेळली नाही मात्र ते फायनलला पोहोचले. यावेळेस ऑस्ट्रेलियाला जिंकणे कठीण वाटते. टीम इंडिया जसा परफॉर्मन्स देत आहे ते पाहता कोणतीही गडबड होणार नाही असे दिसते.


टीम इंडियाला हे लक्षात ठेवावे लागेल की आपल्यासमोर ऑस्ट्रेलिया आहे जे फायनलचा प्रेशर चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात त्यांनी अनेक फायनलचे सामने जिंकले आहेत.


युवराज पुढे म्हणाला, इंडियाचा परफॉर्मन्स वर्ल्डकपमध्ये असा सुरू आहे की सर्व संघ घाबरलेले आहेत. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली तर स्कोर ३५० ते ४०० पर्यंत पोहोचत आहे. जर आपली सलामीची जोडी चांगली कामगिरी करत असेल तर आपण खेळात चांगली आघाडी घेऊ शकतो. जर सुरूवातीचे तीन फलंदाज लवकरच बाद झाले तर आपल्यावर दबाव येऊ शकतो. हे अनेकदा आमच्यासोबत झाले आहे. जर असे नाही झाले तर भारताला हरवणे कठीण आहे.


रोहित शर्माची बॅटिंग कमालीची आहे. ते जर ४० बॉल खेळतील तर आरामात ७०-८० धावा करतील. जर ते १०० बॉल खेळले तर सहज २०० धावा करतील. ते टीम प्लेयर आहेत. त्यांच्यासाठी संघ आधी आहे.

Comments
Add Comment

Ind beat Sa 1st ODI : थरार शेवटच्या षटकापर्यंत! रांची वनडेत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय; विराटचे शतक, कुलदीपचा भेदक मारा

रांची : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला रोमांचक सामना

Virat Kohli Century : रांचीत किंग कोहलीचा धमाका! वनडेत ५२ वे शतक झळकावत विराट कोहलीने रचला इतिहास; तेंडुलकरचा ५१ शतकांचा विक्रम मोडला

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील (IND vs SA) रांची येथील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या

Rohit sharma....रोहित शर्मा ODI क्रिकेटचा नवा 'सिक्सर किंग'

रांची : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचत ‘सिक्सर किंग’ बनला आहे. दक्षिण

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकत ऋतुराज गायकवाड याला संधी; रिषभ पंतला डच्चू

रांची : रांची येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रंगत आहे. आयसीसी चॅम्पियन्स

IND VS SA : एस. बद्रीनाथने निवडली वनडे मालिकेची टीम.. रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश; पण रिषभ पंत?

रांची IND vs SA : रांची येथे उद्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. कसोटी मालिकेतील पराभवानंतर

कधी सुरू होणार भारत - दक्षिण आफ्रिका ODI ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. आता रविवार ३० नोव्हेंबर