world cup 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया असणार आमनेसामने

  149

कोलकाता: विश्वचषक २०२३च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवत शानदार पद्धतीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान १६ बॉल राखत पूर्ण केले.


२०२३च्या वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला तीन विकेटनी हरवले. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना डेविड मिलरच्या शतकी खेळीच्या जोरावर २१२ धावा केल्या होत्या. हा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. यात रोमहर्षक सामन्यात आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला. त्यांनी हा सामना ३ विकेटनी गमावला.


आता हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाच्या संघाने फायनलमध्ये बाजी मारली आहे. आता अंतिम सामन्याचा मुकाबला १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यात कांगारूंची टक्कर भारतीय संघाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ८व्यांदा फायनल खेळण्यासाठी उतरणार आहे तर भारतीय संघाचा हा चौथा खिताबी सामना असेल.



ऑफ्रिकेविरुद्ध जिंकताना ऑस्ट्रेलियाला सुटला घाम


या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात कांगारूच्या संघाने ७ विकेट गमावत ४७.२ षटकांत हा सामना जिंकला. दरम्यान, आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी चांगलाच घाम आणला. कारण आफ्रिकेने १७४ धावांत त्यांचे ६ विकेट काढले होते.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल