world cup 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया असणार आमनेसामने

कोलकाता: विश्वचषक २०२३च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवत शानदार पद्धतीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान १६ बॉल राखत पूर्ण केले.


२०२३च्या वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला तीन विकेटनी हरवले. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना डेविड मिलरच्या शतकी खेळीच्या जोरावर २१२ धावा केल्या होत्या. हा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. यात रोमहर्षक सामन्यात आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला. त्यांनी हा सामना ३ विकेटनी गमावला.


आता हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाच्या संघाने फायनलमध्ये बाजी मारली आहे. आता अंतिम सामन्याचा मुकाबला १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यात कांगारूंची टक्कर भारतीय संघाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ८व्यांदा फायनल खेळण्यासाठी उतरणार आहे तर भारतीय संघाचा हा चौथा खिताबी सामना असेल.



ऑफ्रिकेविरुद्ध जिंकताना ऑस्ट्रेलियाला सुटला घाम


या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात कांगारूच्या संघाने ७ विकेट गमावत ४७.२ षटकांत हा सामना जिंकला. दरम्यान, आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी चांगलाच घाम आणला. कारण आफ्रिकेने १७४ धावांत त्यांचे ६ विकेट काढले होते.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत