world cup 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया असणार आमनेसामने

  144

कोलकाता: विश्वचषक २०२३च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवत शानदार पद्धतीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान १६ बॉल राखत पूर्ण केले.


२०२३च्या वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला तीन विकेटनी हरवले. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना डेविड मिलरच्या शतकी खेळीच्या जोरावर २१२ धावा केल्या होत्या. हा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. यात रोमहर्षक सामन्यात आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला. त्यांनी हा सामना ३ विकेटनी गमावला.


आता हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाच्या संघाने फायनलमध्ये बाजी मारली आहे. आता अंतिम सामन्याचा मुकाबला १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यात कांगारूंची टक्कर भारतीय संघाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ८व्यांदा फायनल खेळण्यासाठी उतरणार आहे तर भारतीय संघाचा हा चौथा खिताबी सामना असेल.



ऑफ्रिकेविरुद्ध जिंकताना ऑस्ट्रेलियाला सुटला घाम


या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात कांगारूच्या संघाने ७ विकेट गमावत ४७.२ षटकांत हा सामना जिंकला. दरम्यान, आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी चांगलाच घाम आणला. कारण आफ्रिकेने १७४ धावांत त्यांचे ६ विकेट काढले होते.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला