Buldhana Accident : ऐन भाऊबीजेच्या दिवशी अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

बुलढाण्यात ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिली धडक


बुलढाणा : गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या (Bhaubeej) दिवशी देखील एक भीषण अपघात (Buldhana Accident) झाला. काल रात्री बाराच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने (Travels) दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील वडनेर गावाजवळ हा अपघात घडला. या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.


या अपघातात मरण पावलेल्या तीनही व्यक्ती तरुण होत्या. भाऊबीजेच्या दिवशी त्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने आजूबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्निल करणकार (वय २७ वर्ष, राहणार जळगाव खान्देश) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष, राहणार वराड तालुका भुसावळ), आकाश राजू आखाडे (राहणार कल्याण) अशी मृत तरुणांची नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल (बुधवारी) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक ६ येथून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. दरम्यान, वडनेर गावाजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Buldhana News : हृदयद्रावक! लेकीचं कन्यादान करतानाच बापाने सोडले प्राण; बुलढाण्यात लग्नमंडपातच हळहळ

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात एका मंगलमय प्रसंगाचे रूपांतर क्षणातच एका

Pune News : पुण्यात खळबळ! 'त्या' ६ तासांचं गूढ काय? १०० सीसीटीव्ही तपासूनही पुण्यातील बॉम्ब प्रकरणाचा सूत्रधार मोकाटच!

पुणे : पुण्याच्या हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात आयईडी (IED) स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्याने संपूर्ण शहरात

Oath-Taking Ceremony Vidhanparishad : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी

State gov issues regulations for fuel saving :वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस बस-मेट्रोने प्रवास, इंधन बचतीसाठी राज्य सरकारकडून नियमावली

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने

HSRP : १ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य..

वाहनधारकांनी वेळेत अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घ्यावी; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड मुंबई : राज्यातील वाहन

Jalgaon : सुखी संसाराचे अवघे २० दिवस ! उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू

Jalgaon : संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेकांना जीव